शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

शासनाचा हात आखडता; शेतकऱ्यांना ‘सन्मान’ मिळेना !, मदतीची प्रतीक्षाच

By नितीन काळेल | Updated: July 4, 2025 18:21 IST

सातारा जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी : पाऊस पडला, पेरणीही झाली, तरीही प्रतीक्षाच

नितीन काळेलसातारा : केंद्रानंतर राज्य शासनाकडूनही शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी वर्षाला प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जात आहेत; पण आता पाऊस पडून पेरणीही झाली; पण दोन्ही शासनाकडून हात आखडता असल्याने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मानचा प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. ही मदत तीन हप्त्यात मिळत आहे. त्यानुसार योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली. केंद्र शासनाकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना १९ हप्ते मिळालेले आहेत.आता २० व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर राज्य शासनानेही दोन वर्षांपूर्वी ‘नमो’ शेतकरी सन्मान योजना घोषित केली. प्रधानमंत्री सन्मान योजनेत पात्र शेतकरीच राज्याकडूनही लाभ घेतात; पण राज्य शासनाचाही अजून हप्ता मिळालेला नाही. बहुतांश वेळा केंद्राबरोबरच राज्य शासनाचाही हप्ता मिळत असतो.

२० वा हप्ता जुलैमध्येच मिळणार !केंद्र शासनाच्या योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यात वितरित करण्यात आला होता. २० व्या हप्त्याबाबत अजून निर्णय जाहीर झालेला नाही; पण याच महिन्यात पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा अंदाज आहे. कारण, चार महिन्याला दोन हजारांची मदत दिली जाते. एप्रिल ते जुलै असे चार महिने गृहीत धरतात.

केवायसी अन् आधार प्रमाणीकरण आवश्यक..या योजनेसाठी ई-केवायसी, तसेच आधार प्रमाणीकरण करावे लागते. जिल्ह्यात सध्या ९ हजार ६५६ ई-केवायसी करण्याचे शेतकरी बाकी आहेत. त्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही, तसेच आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांचा आकडाही मोठा आहे.

जिल्ह्यातील योजनेसाठी पात्र शेतकरीतालुका - संख्याजावळी - २५,१७०कऱ्हाड - ७१,३८९खंडाळा - २०,१०८खटाव - ५१,३७४कोरेगाव - ४२,४८५महाबळेश्वर - ७,३५७माण - ४६,६५८पाटण - ५७,०६१फलटण - ५०,६२१सातारा - ५०,५४५वाई - २९,३९२

४ लाख ५२ हजार लाभधारक..सातारा जिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ७०३ शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला आहे. ईकेवायसी आणि आधारप्रमाणीकरण राहिल्याने हजारो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सध्या ४ लाख ५२ हजार १६० शेतकरी पात्र ठरले आहेत.

राज्याच्या वाढीव तीन हजारांचे गुपितच !राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना केंद्राचे आणि राज्याचे मिळून वर्षाला १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजे राज्य शासन वर्षाला जादा ३ हजार रुपये देणार आहे; पण आताच्या हप्त्यात वाढीवमधील एक हजार रुपये जादा मिळणार का, हे अजून तरी गुपितच आहे.