शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मायणी, येरळवाडी परिसर ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : खटाव तालुक्यातील मायणी व येरळवाडी तलाव परिसरामध्ये पक्ष्यांच्या विविध जाती वर्षभर पाहावयास मिळत असतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी व येरळवाडी तलाव परिसरामध्ये पक्ष्यांच्या विविध जाती वर्षभर पाहावयास मिळत असतात. त्यामुळे शासनामार्फत पक्ष्यांचे संरक्षण व्हावे. यासाठी या भागास मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले होते. मात्र आता हे क्षेत्र ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत राजपत्र (अधिसूचना) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यासाठी मायणी, कानकात्रे, अंबवडे, नडवळ, येरळवाडी, बनपुरी गावांच्या परिसरातील ८६६ हेक्‍टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

कोल्हापूर वनवृत्तमधील सातारा जिल्ह्याच्या सातारा वनविभागाच्या वडूज वनपरिक्षेत्राच्या मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये परिस्थितीकीय, प्राणीजातीय व वनस्पतीविषयक महत्त्वाचे असल्याने यामध्ये लेसर फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ब्लॅक-टेल्ड, गाॅडविट, जकाना, ओपन बिल्ड स्टोर्क आदी पक्षी व त्यातील प्राणी जाती व वनस्पती तसेच संरक्षित करण्याच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाचा स्थानिक सामुदायिक विचारविनिमय केल्यानंतर हे क्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून गठित करणे गरजेचे आहे, असा निर्णय घ्यावा असे वाटले.

त्यामुळे वन्य संरक्षण अधिनियम कायद्यातील सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचना (राजपत्र) शासनाचे उपसचिव (वने) गजेंद्र नरवणे यांनी प्रसिद्ध केली. यामध्ये मायणी पक्षी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाणारे क्षेत्र आता ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये समूह क्रमांक एक मायणी तलाव व समूह क्रमांक दोन येरळवाडी तलाव असे दोन समूह निश्चित करण्यात आले आहेत.

यामध्ये मायणी तलाव व परिसर २१८.२४ हेक्‍टर, कानकात्रे तलाव व परिसर सुमारे १४.९४ हेक्टर, अंबवडे परिसर ७०.७२ हेक्टर, नडवळ परिसर १३२.४० हेक्टर, येरळवाडी तलाव बुडीत क्षेत्र ३२६.२४ हेक्टर व बनपुरी तलाव बुडीत क्षेत्र १०४.२१ असे एकूण ८६६.७५ हेक्टर म्हणजे ८.६७ चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

या संवर्धन राखीव क्षेत्रसाठी राखीव वनक्षेत्र व शासकीय जमीन निश्चित करण्यात आली असून, या सर्व क्षेत्राच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील या भागाचा आता फक्त पक्षी संवर्धन करण्यासाठी उपयोग न करता पक्ष्यांबरोबर वन्य प्राण्यांचे संवर्धन या राखीव क्षेत्रात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(दोन कोट येणार आहेत..)