शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मायणी प्रादेशिक पाणी योजनेची घरघर कधी थांबणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

मायणी : शासनामार्फत कायम दुष्काळी असलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र ...

मायणी : शासनामार्फत कायम दुष्काळी असलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र या प्रादेशिक योजनेचा योग्य अभ्यास न करता याच धर्तीवर अनेक गावे एकत्र करून विविध प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तयार केल्या व आज सर्व योजना अडचणीत सापडल्या आहेत.

खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पातून मायणीसह मोराळे, मरडवाक, चितळी व गुंडेवाडी (मराठानगर) या पाच गावांसाठी योजना तयार करण्यात आली. मायणी व चितळी लोकसंख्या व क्षेत्रफळाने मोठी आहे, तर इतर गावे लहान आहेत. या गावांना किती वेळ पाणी द्यायचे याचे नियोजन करण्यात आले. वीजपुरवठा २४ तास नसल्याने अडचण निर्माण होत होती. त्यानंतर शासनाने या प्रादेशिक योजनांसाठी २४ तास वीजपुरवठा देण्याची सोय निर्माण केली.

विजेचा कमी अधिक दाब, मोटर जळणे, पाईपलाईन फुटणे अशा विविध कारणांमुळे प्रत्येक गावाला मिळणारे पाणी व वेळेचे नियोजन हळूहळू बिघडू लागले. त्यामुळे योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी काहीशी झाली. तीन वर्षांपूर्वी या योजनेतून या चार गावांनी विविध कारणे काढून काढता पाय घेतला.

मायणीसाठी इतर योजना नसल्याने मायणीने ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालवण्याचे ठरविले. पाईपलाईन व विद्युत मोटार कायम ठेवली. प्रचंड लाईट बिल, पूर्वीची थकबाकी तसेच थकबाकीवरील व्याज, अशा विविध कारणांमुळे थकबाकी तीन कोटींवर गेली.

मायणी ग्रामपंचायतीने वेळोवेळी येणारे लाईट बिल व काहीशी थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढत्या थकबाकीचा आकडा त्यावरील व्याजामुळे मायणी प्रादेशिक योजनेला घरघर लागली आहे. त्यामुळे शासनाने या थकबाकीबाबत योग्य तोडगा काढून ग्रामपंचायतीला या अवाजवी वीजबिल व वीजबिलावर व्याज यातून सुटका करावी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

(कोट)

योजनेची थकबाकी पाच गावांतून विभागून द्या, अशी मागणी मंत्रालय बैठकीत व अधिकाऱ्यांच्या बैठकीत वेळोवेळी केली आहे. चोऱ्या, दरोडे यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे खटाव-माण तालुक्यांतील पथदिव्यांचे तोडण्याचा आदेश मागे घ्यावा, तसेच कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे थकीत वीजबिल एकरकमी भरण्याचा तगादा लावू नये, शेतकरीवर्ग अडचणीत जाईल, या बाबींचा सहानुभूती विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.

-डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार