शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics- घडतंय बिघडतंय: उत्तर कऱ्हाडमध्ये 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटतयं ?

By प्रमोद सुकरे | Updated: August 1, 2025 12:07 IST

आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळांचीही मांडीला मांडी 

प्रमोद सुकरे कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपचे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनेल उभी  केली. त्यामुळे व्हायचं तेच झालं. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना हे 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटताना दिसत आहे. कारण मतदारसंघातील अनेक कार्यक्रमाला मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळ आता मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे.खरंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराडसह सातारा,खटाव व कोरेगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.त्यामुळे येथील राजकीय समीकरणेही इतर मतदारसंघापेक्षा निश्चितच वेगळी आहेत. या मतदारसंघात यापूर्वी अनेकदा तिरंगी लढती झाल्या आणि त्याचा फायदा नेहमीच सत्ताधारी आमदारांना झाला. पण गत विधानसभा निवडणुकीत यापूर्वी एकमेकांविरोधात लढलेल्या मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांचे 'मनो-धैर्य' भाजप नेत्यांनी एकवटले.त्यामुळे मतदार संघात परिवर्तनाचे 'कमळ' फुलले.पण विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची निवडणूकही भाजप ताकतीने लढेल असे बोलले जात होते.तशी तयारीही सुरू दिसत होती. मात्र या निवडणुकीत 'मनो-धैर्य' पुन्हा विस्कटले. प्रत्यक्षात मैदानात ३ पॅनेल उतरली अन सत्ताधाऱ्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.पण त्यामुळे भाजप अंतर्गत नेत्यांच्यात राजकीय तणाव वाढला. पण तो आता निवळत चाललेला पाहायला मिळतोय.नुकताच कराड तालुक्यातील बनवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ ही मंडळी एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेली दिसली.त्यानंतर शामगाव व पुसेसावळी येथील कार्यक्रमात सुध्दा हे सगळे एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्यात याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत.

एकमेकांवर केली होती टोकाची टीका ..सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रचारात मुख्य विरोधकांच्या ऐवजी या भाजपच्या दोन्ही पॅनेलच्या  नेत्यांनीच एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमात या नेत्यांचा अबोला कायम दिसला.त्यामुळे हे अंतर आता वाढत जाईल असे बोलले जात होते. पण सध्या तरी या कार्यक्रमातून हे चित्र बदलताना दिसत आहे .

राजकारणात कोणच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो  राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे 'सह्याद्रीच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत बदलले असले चित्र तरी ते होणारच नाहीत पुन्हा एकमेकांचे मित्र' असे म्हणता येणार नाही.आता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका समोर आहेत.त्यामुळे ही राजकीय गरज म्हणून ते एकत्रित दिसतात की हे चित्र वरवरचे आहे हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.