शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस अडीच हजारी; कोयनेतील पाणीसाठा ६० टीएमसी जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:22 IST

कण्हेर धरणातूनही विसर्ग करण्याचे नियोजन. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चारही वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात येणार

सातारा : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोयना ४७, नवजा ९४ आणि महाबळेश्वरला ६६ मिली मीटरची नोंद झाली. तर जूनपासून नवजा व महाबळेश्वरच्या पावसाने अडीच हजार मिली मीटरचा टप्पा पार केला. त्याचबरोबर कोयना धरणातीलपाणीसाठा ५८ टीएमसी जवळ पोहोचला आहे.जिल्ह्यात यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. त्याचबरोबर जून महिन्याच्या उत्तर्राधापर्यंत पावसाची उघडझाप सुरू होती. परिणामी खरीप हंगामातील पेरणी होणार का,धरणसाठा वाढणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण जुलै महिना उजाडताच जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने धो-धो बरसण्यास सुरुवात केली. सलग पंधरा दिवस कास,नवजा, बामणोली, कोयना, महाबळेश्वर, तापोळा, प्रतापगड या भागात धुवाधार पाऊस पडत होता. त्यामुळे लोकांना सूर्यदर्शन झाले नाही. गेल्या बारा दिवसात तर सतत पाऊस १०० मिली मीटरच्यावर झाला. यामुळे ओढे, नाले खळखळून वाहत आहेत.भात खाचरात पाणी साठले. रस्त्यावर दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी भात लावणीस वेगाने सुरुवात झाली आहे. तर पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या प्रमुख धरणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेक धरणांतून विसर्ग सुरू आहे.दरम्यान, एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगर येथे २०७९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला २५३६ आणि महाबळेश्वर येथे २६८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी दमदार झाल्याने पश्चिम भागात दाणादाण उडाली आहे. तर सध्या पावसाचा जोर ओसरला असल्याने धरणात आवक कमी झाली आहे. सोमवारी सकाळी कोयना धरणात २७ हजार क्युसेस वेगाने पाणी येत होते. तर धरणातील साठा ५७.८६ टीएमसी झालेला. धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

पूर्व भागात प्रतीक्षा कायम...जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली असलीतरी पिके येण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. नाहीतर पिके वाळू शकतात. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच छोट्या प्रकल्पातील पाणीसाठा ही कमी झाला आहे. बंधारे कोरडे पडले आहेत.

आता कण्हेर मधूनही विसर्ग...जिल्ह्यातील कोयना, उरमोडी तसेच पुणे जिल्हा हद्दीवरील वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यानंतर आता सातारा तालुक्यातील कण्हेर धरणातूनही विसर्ग करण्याचे नियोजन आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चारही वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे वेण्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी