शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

ढेबेवाडी खोऱ्यात ज्वारीवर ‘काणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

सणबूर : परिसरात रब्बी ज्वारीवर काणी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काणीग्रस्त कणसांमुळे ज्वारीची शिवारे ...

सणबूर : परिसरात रब्बी ज्वारीवर काणी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काणीग्रस्त कणसांमुळे ज्वारीची शिवारे काळवंडल्यासारखी दिसत असून उत्पादन घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ढेबेवाडी परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. त्यावरच शेतकरी कुटुंबांचे वर्षभराचे धान्य नियोजन अवलंबून असते. अलीकडे पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने शेतकऱ्यांचे खरिपातील ज्वारीचे गणित फसत आहे. ऐन काढणीच्या काळातच पावसात सापडल्याने पीक हातचे गेल्याचा अनुभव वारंवार येत असल्याने आता बहुतेक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीवरच भिस्त ठेवली आहे. थंडीच्या दिवसात अल्प पाण्यावर साधणाऱ्या रब्बी ज्वारीचे क्षेत्रही या परिसरात मोठे असून रानडुकरांकडून काही प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा अपवाद वगळता उत्पादनही चांगले मिळत आहे.

यंदा चांगले पाऊसमान व पोषक हवामान यामुळे चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची ज्वारीवरील काणी रोगाच्या प्रादुभार्वामुळे झोप उडाली आहे. या रोगात बुरशी संक्रमणामुळे कणीसावर काळपटपणा दिसतो. ज्वारी फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस किंवा धुक्यामुळे त्यावर रोगाचा फैलाव होतो, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सांगितले.

‘पेरणीपूर्वी गंधकाची पाच ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास हा रोग टाळता येतो. पीक फुलोऱ्यात असताना कॅप्टन किंवा मॅनकोझेब तीन ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणेही उपयुक्त ठरते. पिकाची फेरपालट करावी. हलक्या जमिनीवर रब्बी ज्वारीची पेरणी करताना रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा. मळणीपूर्वी काणीग्रस्त कणसे काढून नष्ट करावीत. म्हणजे पुढे रोगाचा प्रसार होणार नाही’, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सुचविले आहे.

सध्या ढेबेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी काणीचा फैलाव झाल्याचे दिसून येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यामध्ये त्यांना अद्यापही यश आलेले नाही.

- कोट

यंदा ज्वारीचे पीक चांगले साधेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, काणीच्या प्रादुर्भावामुळे जादा उत्पन्नाची शाश्वती वाटत नाही. बहुतेक शिवारातील ज्वारीची कणसे काळी पडलेली आहेत. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.

- दिलीपराव पाटील, शेतकरी

- चौकट

वन्यप्राण्यांचा उपद्रवही वाढला

ढेबेवाडी खोऱ्यात बहुतांश शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेतात. येथील शेतजमीन मुरमाड आहे. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. रब्बी हंगामातील वातावरण येथे पोषक असते. त्यामुळे या हंगामात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र लागवडीखाली असते. सध्या रब्बी पिके जोमात आली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांकडून या पिकांचे नुकसान केले जात आहे. प्राण्यांच्या उपद्रवामुळेही शेतकरी हतबल झाले आहेत.

फोटो : ०१केआरडी०५

कॅप्शन : ढेबेवाडी विभागात ज्वारीवर काणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक काळवंडले असून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.