शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा देशात डंका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : सदृढ बालक असेल तर देश बलशाली बनेल, हे ध्येय घेऊन राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : सदृढ बालक असेल तर देश बलशाली बनेल, हे ध्येय घेऊन राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महाराष्ट्राची भावी पिढी सदृढ, निरोगी व बुद्धिवान होण्यासाठी आणि राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. खंडाळा तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाने गावोगावी विविध उपक्रम राबविले. या अभिनव उपक्रमांची नोंद देशपातळीवर घेण्यात आली असून, या अभियानात खंडाळा तालुका देशात अव्वल ठरला आहे.

भारताची भावी पिढी सक्षम तयार व्हावी, यासाठी पोषण अभियानाची उद्दिष्टे निश्चित करून ते गावपातळीवर राबविण्यात आले. यामध्ये सहा वर्षे वयोगटाखालील बालकांमधील बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, सहा महिने ते पाच वर्षे वयोगटांतील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, १५ वर्षांवरील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे यांचा समावेश करण्यात आला होता.

या अनुषंगाने तालुक्यातील ६५ गावांमध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले गेले. यासाठी बालकांचे पहिले १०० दिवस वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याशिवाय ॲनेमिया, अतिसार कमी करण्यावर भर देऊन हात धुणे व वैयक्तिक स्वच्छता, वैविध्यपूर्ण पौष्टिक आहार याला प्राधान्यक्रम देण्यात आले होते. ही योजना राबविण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन, पोषण आहार बोर्ड व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या विभागांचा समन्वय करण्यात आला असून, महिला व बालविकास विभाग नोडल विभाग म्हणून कामकाज करीत आहे.

(चौकट)

पोषण अभियानाची आवश्यकता....

लोकांना पहिल्या दोन वर्षांतील बालकांच्या आहाराचे महत्त्व अद्यापही कळलेले नाही. यामुळे काही भागांत कुपोषणाची समस्या अजूनही कायम आहे. अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून

कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न केले जात आहेत. बाल्यावस्था हा मानवाच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. गरोदरपणामध्ये महिलांना व जन्मानंतर बालकांस पहिल्या दोन वर्षांत योग्य आहार न मिळाल्यास त्याचे दूरगामी परिणाम हे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर होत असतात. लहान वयात कुपोषणामुळे कमी प्रतिकारशक्ती, कमी बुद्ध्यांक, कमी शैक्षणिक प्रगती, कमी शारीरिक वाढ, संवाद कौशल्याची कमतरता असे विपरित परिणाम होऊ शकतात.

(कोट)

पोषण अभियानांतर्गत पोषणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अंगणवाडी स्तरावर दरमहा समुदाय आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गरोदर महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून मार्गदर्शन करणे, अन्नप्राशन दिवस, सुपोषण दिवस, पूर्व शालेय शिक्षणासाठी प्रवेश करणाऱ्या बालकांचा प्रवेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य काळजी घेणे असे उपक्रम राबविले जातात. यामध्ये अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच खंडाळा तालुका देशात प्रथम कमांकावर आहे.

-एम. ए. भोईटे, बालविकास प्रकल्प अधिकारी

२६खंडाळा

फोटो आहे..