शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

महिला शेतकरी बचत गटाद्वारे शेतीत अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गावपातळीवर महिला बचत गटांच्या निर्मितीतून महिलांना त्यांच्या पायावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुडाळ : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गावपातळीवर महिला बचत गटांच्या निर्मितीतून महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ मिळत आहे. जावळीचे प्रवेशद्वार आणणाऱ्या सरताळे याठिकाणी महिलांनी कृषिका महिला शेतकरी गटाची स्थापना करून शेतीचा अभिनव प्रयोग राबवला आहे. या गटातील महिलांनी एकत्र येत यशस्वीपणे शेती करत अधिकतम उत्पादन घेत चांगला फायदा मिळवला आहे.

जावळी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सरताळे (ता. जावळी) येथील सुचिता काळे, अर्चना नवले, अश्विनी नवले, वैशाली काळे, विजया नवले आदी आठ महिलांनी एकत्रित येत कृषिका शेतकरी महिला बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या भविष्यातील उद्योग उभारणीसाठी भांडवल उभारणीचा विचार करून त्यांनी गावातील शेती करण्याचा निर्णय घेतला. याकरिता या गटाकडून सुरुवातीला गावातील शेती वाट्याने घेण्यात आली.

गटातील महिलांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित शेतीचा प्रयोग यशस्वी केला. शेतीच्या मशागतीपासून ते अगदी उत्पादन हाती घेऊन त्याची विक्री होईपर्यंत सर्व बाबींचे बारकाईने नियोजन केले. शेतीमध्ये सोयाबीनच्या वाणाचे उत्पादन त्यांच्याकडून घेण्यात आले. त्यांना एकरी १६ पोती सोयाबीनचे उत्पादन मिळाले. या सर्व सोयाबीनची प्रतवारी करून त्यांनी बियाण्यांसाठी राखून ठेवले. याची बीजप्रकिया करून कृषी विभागामार्फत उगवणक्षमताही तपासण्यात आली. सुमारे ९८ टक्के इतकी उगवणक्षमता असणाऱ्या या बियाण्याची प्रतिकिलो १०० रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली. सरासरी ४० रुपये सोयाबीन भाव असताना बियाण्यांसाठी विक्री झाल्याने या बचत गटाला दुपटीपेक्षाही अधिकचा नफा मिळाला. तसेच चालूवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये या उत्तम प्रतीच्या बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. तालुक्यातील हा एकमेव महिला शेतकरी बचतगट असून, त्याच्या माध्यमातून भांडवल उभारणी करून भविष्यात एक चांगल्या प्रकारचा उद्योग, व्यवसाय उभारण्याचा या महिलांचा मानस आहे.

(कोट)

महिलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहता आले पाहिजे. आज आम्ही निर्माण केलेल्या कृषिका शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित येत यशस्वीपणे शेती करून चांगला नफा मिळवला आहे. यातून निश्चितच प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. याकरिता कृषी विभागामार्फत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.

- अश्विनी नवले, बचतगट सदस्य

२) कोट:

कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत कृषिका महिला शेतकरी बचतगट तयार झाला आहे. महिलांनी गावातील शेती खंडाने करण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांना गत हंगामात सोयाबीनच्या वाणाची शिफारस केली. बचत गटाची शेती शाळा घेऊन त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत सर्वस्तरावर त्यांना योग्य मार्गदर्शन झाले.

- पांडुरंग खाडे, कृषी सहाय्यक, जावळी

२२ कुडाळ

फोटो : कृषिका महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबवला जात आहे.