शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव झाडांच्या मुळावर, सातारा-कास रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 1:12 PM

सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे.

ठळक मुद्दे विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव झाडांच्या मुळावर, सातारा-कास रस्तागळ्यात मृत्यूचे ताईत अडकवून दोन वर्षांपासून हजारो झाडांचा गुदमरतोय श्वास !

पेट्री : सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढविणारी येथील हिरवीगार दाट झाडी, तसेच कित्येक वर्षे पर्यटकांना सुखावह स्पर्श देत विविध प्रकारच्या आठवणी जोपासणारी येथील मोठमोठी वृक्षे. शहराच्या पश्चिमेकडील निसर्गसौंदर्य अबाधित ठेवणारी या मार्गावरील हजारोंच्या संख्येची वनसंपदा धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे.या वनांमध्ये नीलगिरी, जांभुळ, आंबा, फणस यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

गत दोन वर्षांपासून गळ्यात मृत्यूचे ताईत टांगलेली हजारोंच्या संख्येने असलेल्या वनसंपदेच्या मुळावर विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव बसला जात असल्याने येथील घनदाट, दाट वृक्षाचे रुपांतर शुष्क वाळवंटात तर होणार नाही ना? अशी साशंकता पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमीतून व्यक्त होऊ लागली आहे.साताऱ्याच्या पश्चिमेकडे बोगदा ते कास येथील रस्त्याचे रुंदीकरणात बोगदा ते कास रस्त्यालगत तसेच कास तलावाच्या परिसरातील विविध प्रकारच्या मोठमोठ्या झाडांच्यावर गडांतर येऊन या झाडांवर गत दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात पिवळ्या रंगांच्या लोखंडी पट्ट्या मारून साडेतीन हजारांपर्यंत क्रमांक दिले होते. यामुळे विकासाचा घाव कधी झाडांच्या मुळावर पडेल याची शाश्वती नाही.

रस्त्याचे काम असो अथवा विजेचे खांब रोवून तार ओढण्याचे काम. अशा अनेकविध प्रकारची कोणतीही कामे करायची म्हटले की, प्रथम नजर वळते ती झाडांवर. झाडांचा कधीही अडथळा होत नाही तर झाडेच पर्यावरण असंतुलनातील अनेकविध अडथळे बाजूला करतात. मग आत्ता या झाडांचे आयुष्य संपुष्टात येणार असेल तर या बदलात नव्याने वृक्षारोपण करण्याची पर्यायी व्यवस्था संबंधित खाते काय करणार? अथवा काय केली आहे.विनाशाची टांगती तलवार...पर्यटनस्थळाचा विकास तसेच नागरिकांच्या मुबलक पाण्याचा प्रश्न सोडवला जात असताना येथील कित्येक वर्षापासूनच्या झाडांवर आत्ता विनाशाची टांगती तलवार पडली जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. पर्यावरण समतोल राखत असताना नियम असे सांगतो की, एक झाड नष्ट झाले तर त्याबदलात दहा झाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसर