शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनमधून कऱ्हाडसाठी निधी द्यावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

कऱ्हाड : पालिकेला शहरासाठी जिल्हा नियोजनमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा, यासाठी लोकशाही आघाडीच्यावतीने सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री ...

कऱ्हाड : पालिकेला शहरासाठी जिल्हा नियोजनमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा, यासाठी लोकशाही आघाडीच्यावतीने सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. २०२०-२१ वर्षासाठी जिल्हा नियोजनमधून पालिकेला शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा. या निधीद्वारे शहरात भरीव कामे करता येतील. तसेच प्रलंबित राहिलेली कामेही करता येतील, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक मोहसीन अख्तर अंबेकरी, पल्लवी शिवाजी पवार, सुनंदा दिलीप शिंदे, माजी नगरसेवक सुहास पवार, जयंत बेडेकर, अमित शिंदे उपस्थित होते.

शिवपर्वत कॉलनीत स्वच्छतेची मागणी

मलकापूर : आगाशिवनगर येथील शिवपर्वत कॉलनीत स्वच्छता करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक आनंदराव चव्हाण यांच्यासह इतर नागरिकांनी पत्रकाद्वारे पालिकेकडे केली आहे. कॉलनीमध्ये सर्वत्र कचरा पसरला आहे. झाडी वाढली आहे. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच कॉलनीमध्ये एकही गटार नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. कॉलनीत स्वच्छता दररोज करावी, असे पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर नागरिकांच्या सह्या आहेत.

ट्रान्स्फॉर्मर बसविल्याने ग्रामस्थांची सोय

पाटण : कुसरुंड, ता. पाटण येथे नवीन विजेचा ट्रान्स्फॉर्मर बसविल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. ट्रान्स्फॉर्मरअभावी गावात कमी दाबाचा वीजपुरवठा होत होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. त्यानुसार गृहराज्यमंत्री देसाई यांनी या गावासाठी दुसऱ्यांदा ट्रान्स्फॉर्मर मंजूर करून ते काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची सोय झाली असून, खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

शामगाव घाटात फलकाची दुरवस्था

शामगाव : शामगाव घाट ते वाघेरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या सूचना फलकांची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्यावेळी वाहने चालविताना वाहनचालकांना दिशा समजत नसल्याने या मार्गावर छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या घाटमार्गाच्या पायथ्याला पोलीस चौकीही उभारण्यात आली होती. मात्र, सध्या त्याचा पोलिसांकडून वापर केला जात नसल्याचे दिसते. भुरटे चोर फलक उचकटून नेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर केवळ फलकांचे सांगाडे शिल्लक आहेत. बांधकाम विभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कऱ्हाडात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण

कऱ्हाड : येथील पालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नोडल ऑफिसर आर. डी. भालदार, करवसुली अधिकारी उमेश महाजन, आरोग्य, बांधकाम, गार्डन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पालिकेच्यावतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे काम सुरू आहे. कऱ्हाड शहर ग्रीन सिटी करण्याच्यादृष्टीने पालिकेने पाऊल उचलले आहे.

काले ते मसूर बस वेळेत सोडण्याची मागणी

कऱ्हाड : काले ते मसूर बस वेळेत येत नसल्यामुळे ग्रामस्थांना बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. सकाळी पावणेसात वाजता सुटणारी काले-मसूर बस सध्या आठ वाजता गावात येते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कऱ्हाडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कऱ्हाड आगाराने ही बस साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांतून केली जात आहे.