शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

जिल्ह्यातील चार कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 4:42 PM

जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी असे एकूण १२ कारखाने, काही कारखान्यांनी ऊस गाळप करून देखील निम्मी रक्कमही दिलेली नाही.

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यातील अजिंक्यतारा, बाळासाहेब देसाई, सह्याद्री, रयत (अथणी शुगर) या चार कारखान्यांनी चालू हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. मात्र काही कारखान्यांनी ऊस गाळप करून देखील निम्मी रक्कमही दिलेली नाही.

साखर आयुक्त कार्यालयाच्यावतीने चालू हंगामातील एफआरपीबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी असे एकूण १२ कारखाने सुरू आहेत. सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करत आहेत. काही कारखाने बंद असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस देखील गाळपासाठी सुरू असलेले कारखाने नेत आहेत.

साखर आयुक्तांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्ण दिली आहे. जयवंत शुगर या कारखान्याने जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा ९५.३९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. कृष्णा कारखान्याने देखील ८१.६१ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे.

फलटण येथील शरयू कारखान्याने मात्र केवळ ३९.१२ टक्के इतकी कमी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. माण-खटाव, स्वराज या कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत तरी एफआरपीची रक्कम दिलेली नव्हती. दत्त इंडिया साखरवाडी या कारखान्याने ६८.५२ टक्के, गोपूज येथील ग्रीन पॉवरने ६९.१४ टक्के, जरंडेश्वर शुगरने ५९.११ टक्के इतकी एफआरपीची रक्कम दिलेली आहे. जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपीच्या व्यतिरिक्त रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही.

उशिरा ऊस जातो म्हणून घाबरू नका

शेतामध्ये ऊस उभा राहिला तर त्याचे टनेज घटेल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. शेतकऱ्याने ही भीती मनातून काढून टाकली पाहिजे. ऊस उशिरा गेला तरी काही फरक पडत नाही, पण जो कारखाना चांगला दर देत आहे, त्याच कारखान्याला ऊस घातला, तर शेतकऱ्याला खर्च वजा जाता हाती काही पैसा पडू शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने