शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा.. वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहितांना जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या ...

सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहितांना जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, अशी स्थिती नवविवाहितांची झाली आहे.

आषाढ महिना नवविवाहितांसाठी आतुरतेचा असतो. या महिन्यात पाच दिवस नवविवाहितांना हक्काने माहेरी आणले जाते. याच दरम्यान येणारे श्रावण सण आणि त्यातील खेळ नवविवाहितांच्या विशेष आवडीचे असतात; मात्र गेल्या सव्वा वर्षात कोरोनाचे संकट ठाकले आणि प्रत्येकाला घरातच राहण्याची वेळ आली. त्यामुळे ज्यांचे माहेर दूर आहे. अशा नवीन विवाह झालेल्या मुलींना आपल्या माहेरची आठवण सतावू लागली आहे.

आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गावागावात वेगवेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि खेळ यंदाही होणार नाहीत असे चित्र दिसते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे यावर मर्यादा आल्या आहेत.

चौकट

मुलीला बघण्यासाठी व्हिडिओ कॉल

लग्न झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाणार हे माहीत असते पण ती तिच्या स्वत:च्या घरी गेली तरी आपलं घर रिकामं होतं. शिक्षणाच्या निमित्तानं आम्ही तिला कुठंच बाहेर पाठवलं नव्हतं. पण आता गेल्या दोन महिन्यांत तिला बघायचं असेल तर केवळ व्हिडिओ कॉल हाच एकमेव पर्याय आहे.

००००००००००

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या माहेरी यायला मुलगीच कचरत आहे. तिच्या मतानुसार लांबून प्रवास करुन माहेरी यायचं. या प्रवासात जर काही बाधा झाली तर मी स्वत:ला माफ नाही करू शकणार. यामुळे हे संकट टळावं आणि लेक माहेराला यावं असं वाटतं.

कोट

सहा महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं. कोल्हापूर सासर असल्याने कोणी भेटत असतं. मर्यादित झालेल्या लग्न सोहळ्यातही आता माहेरकडच्यांच्या गाठीभेटी पडतात. त्यामुळे माहेरच्या लोकांना भेटणं होतं. अडचण माहेरी राहण्याची आहे. कोरोनामुळे प्रवास करुन येऊन राहणं आरोग्याच्या दृष्टीनेही हानीकारक असल्याने ते मी टाळतेच.

- नेहा जाधव, कोल्हापूर.

कोरोना आता जाईल, मग जाईल म्हणत दीड वर्षे मुक्काम ठोकला. लग्नही कमी लोकांत केलं आणि नंतर गेट टूगेदर करु असं आम्ही ठरवलं होतं. पण दुर्दैवाने लग्नाला आठ महिने झाले तरीही कोरोना जायचा नाही, अशीच भावना मनात येत आहे.