शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बावधनकरांच्या सहनशीलतेचा अंत !

By admin | Updated: March 16, 2016 23:48 IST

यात्रेपूर्वी बसस्थानक स्वच्छ व्हावे : नागरिकांची अपेक्षा; अन्यथा ‘साफ’ आंदोलन करण्याचा इशारा--एसटीला हवायधक्का - तीन

तानाजी कचरे -- बावधन -संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या बावधन, ता. वाई येथील बगाड यात्रा होळी पौर्णिमेपासून (दि. २३) सुरू होत आहे. गेली काही वर्षे कर्नाटकातूनही भाविक या यात्रेला येतात. यात्रेपूर्वी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला एसटी बसस्थानक परिसर पूर्णत: स्वच्छ व्हावा, यासाठी ग्रामस्थ व परिसरातील मंडळींचा दबाव वाढत आहे. यात्रेच्या मीटिंगमध्येही याचे पडसाद उमटले. यात्रेपूर्वी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परिवहन खात्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेता एसटी प्रशासनाने तत्परतेने बसस्थानक परिसर मोकळा करावा, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. मात्र एसटी प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. गावच्या आरोग्याबरोबरच हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे. यामुळे एसटी प्रशासन काय भूमिका घेते यावर अवलंबून आहे. यात्रेपूर्वी काहीच हालचाल न झाल्यास तरुणाईचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत एसटी प्रशासन ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत गावात एसटी येऊ द्यायची नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे आंदोलन होऊ नये आणि सुसंवादाने हा प्रश्न मार्गी लावावा, असेही प्रयत्न होत आहेत. एसटी प्रशासनाने याकडे काणाडोळा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहणार आहे. एसटी प्रशासनाची उदासीनता आणि ग्रामस्थांची आग्रही मागणी याचा मेळ बसणार का? ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी सुसज्ज बसस्थानकासाठी निधीच्या मन:स्थितीत असतानाही प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास यात्रेपूर्वी लोक आंदोलनातून हा परिसर ‘साफ’ झाल्यास आश्चर्य वाटू नये. (समाप्त)बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे ठराव परिवहन खात्याकडे देऊन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व एसटी प्रशासनाने लक्ष घालावे; अन्यथा लोकांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अरुणादेवी पिसाळ, माजी जि. प. अध्यक्षा.एसटी प्रशासन याकडे काणाडोळा करत आहे. परिवहन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र जनआंदोलन होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण ? यात्रेच्या अगोदर हा परिसर स्वच्छ व्हावा. बगाड यात्रेला बावधन गावात राज्यातून लाखो भाविक येत असतात. त्यासाठी स्वच्छता गरजेचे आहे.- सतीश पिसाळ, बावधन सरपंच