शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने... बळीराजाची चिंता वाढली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

जगन्नाथ कुंभार लोकमत न्यूज नेटवर्क मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व ...

जगन्नाथ कुंभार

लोकमत न्यूज नेटवर्क

मसूर : मसूर परिसरात पावसाने दडी मारली असली तरी पडलेल्या तुरळक सरींमुळे पेरणी व टोकणी केलेली पिके कशीबशी तग धरुन आहेत. परंतु, या भागात मोठ्या पावसाची गरज आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांची चिंता वाढेल. सद्यस्थितीत धरणामध्ये पाण्याचा पुरेसा साठा असल्याने कऱ्हाड तालुक्यातील आरफळ कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर संपूर्ण कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी व टोकणीची कामे तसेच आडसाली ऊस लागणीची कामे पूर्ण केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली आहे. जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर आडसाली लागण केलेल्या ऊसाची उगवण चांगल्या पद्धतीने झाली आहे. तसेच टोकणी व पेरणी केलेल्या सोयाबीन, भुईमूग, घेवडा, चवळी, मूग, मका आदी पिकांची उगवणही चांगल्याप्रकारे झाली आहे. त्यामुळे आभाळाकडे बघत शेतकरी पिकांची भांगलण, कोळपणी अशी आंतरमशागतीची कामे करत आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्याने आडसाली ऊसासह घेवडा, सोयाबीन, भुईमूग आदीसह सरीवर टोकणी केलेली पिके दुपार धरू लागली आहेत. याचा परिणाम ऊसासह सर्व पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

साधारणपणे रोहिणी नक्षत्रात रोपांच्या भात लागणीसाठी रोपे तयार करण्यासाठी शेतात बी टाकलेले असते. कऱ्हाड तालुक्याच्या काही भागात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पेरणीऐवजी रोपांची लागण केलेल्या भाताचे उत्पादन चांगले मिळत असल्याने शेतकरी भाताच्या रोपांची लागण करतात. साधारणपणे जून अखेरपर्यंत भाताच्या रोपांच्या लागणीला सुरुवात होते. मात्र, पावसाने ओढ दिल्याने भाताच्या रोपांची लागण रखडली होती. आता पाऊस पडेल, या आशेवर लावणी केली जात आहे.

कोट.....

गेल्या काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यासारखे रखरखीत कडक ऊन पडत आहे. त्याचा विपरीत परिणाम उभ्या पिकावर होत आहे. रुसलेला वरुणराजा वेळीच प्रसन्न होऊन बरसला नाही तर संकटाला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.

- सतीश कांबिरे, कांबिरवाडी.

फोटो १८मसूर-अॅग्री

माळवाडी येथील शेतात सायकल कोळप्याच्या सहाय्याने शेतकरी कोळपणी करत आहेत. (छाया : जगन्नाथ कुंभार)