शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

दुष्काळी भागाला वरदान ठरणारी योजना- - अमोल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 1:05 AM

जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. ही योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे. येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्या वाहत्या होणार आहेत. - अमोल निकम, कार्यकारी अभियंता, जिहे-कटापूर योजना

ठळक मुद्दे जिहे-कटापूरचे पाणी मार्चअखेर नेर तलावात--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

सागर गुजर।सातारा : माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांतील शेती जहे-कटापूर योजनेमुळे सिंचनाखाली येणार आहे. मार्च २०२० पर्यंत एका जलवाहिनेचे काम पूर्ण करून नेर तलावात पाणी सोडले जाणार आहे. या धरणातून येरळा नदी उन्हाळ्यातही वाहती ठेवण्यात यश येईल. या योजनेमुळे दुष्काळी भागातील शेतकरी निश्चितपणे नगदी पिके घेऊ शकणार आहेत.

  • प्रश्न : जिहे-कटापूर योजनेचे स्वरूप कसे आहे?

उत्तर : जिहे-कटापूर ही योजना अत्यंत महत्त्वकांक्षी अशी योजना आहे. सातारा तालुक्यात कृष्णा नदीतून हे पाणी उचलून ते तब्बल १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर तलावात सोडण्यात येणार आहे. नेर नदीतून हे पाणी येरळा नदीत सोडले जाणार असून, पुढे आंधळी धरणातही पाणी सोडून माणगंगा नदी वाहती ठेवण्यात येणार आहे. या योजनेमुळे दुष्काळी भागातील पाणी पातळीत निश्चितपणे वाढ होईल.

  • प्रश्न : या योजनेचे लाभक्षेत्र किती आहे?

उत्तर : खटाव तालुक्यातील ४७ गावे आणि माण तालुक्यातील २० गावांतील सुमारे २७ हजार ५०० हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर तर माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

  • प्रश्न : किती केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहेत?

उत्तर : येरळा नदीवर १५ केटीवेअर आणि माणगंगा नदीवर १७ केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एका केटीवेअरचे काम सुरू असून, उर्वरित ३१ केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मागील पावसाळ्यात दुष्काळी भागामध्ये चांगला पाऊस झाला. या पावसामुळे दोन्ही नद्यांवरील केटीवेअर बंधारे पाण्याने भरले आहेत. साहजिकच झिरपलेल्या पाण्यामुळे फायदा होईल.

अशी आहे जिहे-कटापूर योजनाकृष्णा नदीवर सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर या गावाजवळ पंप हाऊस तयार करण्यात आले आहेत. जिहे, एकसळ, गोळेवाडी या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये पाणी उचलून हे पाणी खटाव तालुक्यातील नेर तलावात सोडण्यात येईल. तिथून हे पाणी येरळा नदीत सोडले जाईल. या नदीतून केटी बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी पाणी अडवण्यात येणार आहे. तर तिथून पुढे हेच पाणी आंधळी तलावात नेले जाणार आहे. हा तलाव भरून ते पाणी माणगंगा नदीत सोडले जाणार आहे. या नदीवरही केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत.नैसर्गिक उताराचा होणार फायदा

कृष्णा नदीतून उंच अशा दुष्काळी भागात पाणी उचलून नेताना पंप हाऊसची गरज पडणार आहे. मात्र, येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्यांतून लगतच्या शेतकऱ्यांना पाणी देताना बहुतांश ठिकाणी नैसर्गिक उताराचा फायदा घेतला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड पडणार नाही.

टॅग्स :satara-acसातारा