शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये डीपी चोर बिनधास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

आदर्की : सातत्याने डीपी चोरीला जाणे व नादुरुस्त होण्याच्या घटनांमुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच चोरीला ...

आदर्की : सातत्याने डीपी चोरीला जाणे व नादुरुस्त होण्याच्या घटनांमुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच चोरीला गेलेल्या डीपी सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. फलटण तालुका शिवसेनाप्रमुख प्रदीप झणझणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, आतापर्यंत २०१७-१८ मध्ये १७ डीपी चोरीला गेल्या आहेत. २०१८-१९मध्ये ४३ डीपी, २०१९-२० मध्ये ७१, तर २०२०-२१ मध्ये ५९ डीपी चोरीला गेल्या आहेत. एकंदरीत मागील चार वर्षांपासून एकूण १९० डीपी चोरीला गेलेल्या असून, डीपी चोरीचा चढता आलेख आहे. प्रत्येक डीपी चोरीला गेल्यानंतर फलटण वीज महावितरणने फलटण पोलिसांकडे त्यासंबंधी गुन्हे दाखल केले आहेत. परंतु आजतागायत एकही डीपी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. फलटण तालुक्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी व नामुष्कीजनक बाब असून, लवकर या समस्या निकाली काढण्यात याव्यात. असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डीपी चोरीला गेली अथवा नादुरुस्त झाली की वीज महावितरणकडे नवीन किंवा दुरुस्त डीपी शिल्लक नसल्यामुळे डीपी बसवण्यासाठी नेहमी दिरंगाई होत असल्याचे फलटण वीज महावितरणचे अधिकारी सांगत असतात तसेच अगोदर बिल भरा, मगच डीपी मिळेल, अशी हुकूमशाही पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे डीपी बसविण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे कोट्यवधी रुपयांचे सातत्याने नुकसान होत आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिवाला पिकांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा कायम घोर लागलेला असतो. याकडे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन हाती घेतील व त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

चौकट..

शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

शेतकऱ्यांनी वीज महावितरणकडून डिपाॅझिट भरून सर्व अटी व शर्थी पूर्ण करून रितसर वीज कनेक्शन घेतल्यानंतर डीपी चोरीला गेली अथवा नादुरुस्त झाली की दोन दिवसांत डीपी बसवून वीजपुरवठा पूर्ववत करून देणे हे वीज महावितरणचे कर्तव्य आहे. डीपी बसवण्यासाठी वीज महावितरणने शेतकऱ्यांकडे कोणतीही मागणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणत्याही मागण्या, अटी व शर्तींशिवाय डीपी बसवून देणे वीज महावितरणला बंधनकारक असतानाही महावितरणच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या लक्षात आणून दिले.