शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

गटकोट संवर्धनाचा वाईतील तरुणांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:37 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

ठळक मुद्देभटकंती सह्याद्रीची ग्रुपचा उपक्रम अनेक ठिकाणी स्वच्छता करून जपला इतिहास

पांडुरंग भिलारे वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत पांडवगड, केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, चंदनवंदन गड अनेकवेळा श्रमदान करून संवर्धन केले.भटकंती ग्रुपचा प्रतिनिधी सौरभ जाधव म्हणाले, किल्ल्यावरील ढासलेल्या तटबंदी, ढासळलेले बुरुज, वाढलेली झाडीझुडपे, किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात गडकोटांनी रक्षा केली आता त्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक माणसाला प्रेरणा देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची तर आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे-जिथे ज्या-ज्या संस्था गड-किल्ले संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्यावर संवर्धनाचे काम करणे. तसेच आपण गड-किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करणे आवश्यक आहे.वाई परिसरातील सर्वच किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान असेल, किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले केंजळगडला भटकंती सह्याद्रीची परिवार यासाठी झटत आहे. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, अनिल वाशिवले, अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक भाग घेत असतात.गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नसह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान असून, येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. तरी या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे, असे मत भटकंती सह्याद्रीच्या सदस्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर