शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

गटकोट संवर्धनाचा वाईतील तरुणांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:37 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

ठळक मुद्देभटकंती सह्याद्रीची ग्रुपचा उपक्रम अनेक ठिकाणी स्वच्छता करून जपला इतिहास

पांडुरंग भिलारे वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत पांडवगड, केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, चंदनवंदन गड अनेकवेळा श्रमदान करून संवर्धन केले.भटकंती ग्रुपचा प्रतिनिधी सौरभ जाधव म्हणाले, किल्ल्यावरील ढासलेल्या तटबंदी, ढासळलेले बुरुज, वाढलेली झाडीझुडपे, किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात गडकोटांनी रक्षा केली आता त्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक माणसाला प्रेरणा देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची तर आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे-जिथे ज्या-ज्या संस्था गड-किल्ले संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्यावर संवर्धनाचे काम करणे. तसेच आपण गड-किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करणे आवश्यक आहे.वाई परिसरातील सर्वच किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान असेल, किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले केंजळगडला भटकंती सह्याद्रीची परिवार यासाठी झटत आहे. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, अनिल वाशिवले, अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक भाग घेत असतात.गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नसह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान असून, येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. तरी या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे, असे मत भटकंती सह्याद्रीच्या सदस्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर