शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

गटकोट संवर्धनाचा वाईतील तरुणांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:37 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

ठळक मुद्देभटकंती सह्याद्रीची ग्रुपचा उपक्रम अनेक ठिकाणी स्वच्छता करून जपला इतिहास

पांडुरंग भिलारे वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत पांडवगड, केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, चंदनवंदन गड अनेकवेळा श्रमदान करून संवर्धन केले.भटकंती ग्रुपचा प्रतिनिधी सौरभ जाधव म्हणाले, किल्ल्यावरील ढासलेल्या तटबंदी, ढासळलेले बुरुज, वाढलेली झाडीझुडपे, किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात गडकोटांनी रक्षा केली आता त्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक माणसाला प्रेरणा देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची तर आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे-जिथे ज्या-ज्या संस्था गड-किल्ले संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्यावर संवर्धनाचे काम करणे. तसेच आपण गड-किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करणे आवश्यक आहे.वाई परिसरातील सर्वच किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान असेल, किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले केंजळगडला भटकंती सह्याद्रीची परिवार यासाठी झटत आहे. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, अनिल वाशिवले, अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक भाग घेत असतात.गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नसह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान असून, येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. तरी या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे, असे मत भटकंती सह्याद्रीच्या सदस्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर