शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

टीका करणाऱ्या भाजपचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 12:06 IST

Prithviraj Chavan Bjp Congress Satata : ‘कोरोनासाठी देशात कोणत्याही राज्याने पॅकेज दिलेले नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देटीका करणाऱ्या भाजपचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला : पृथ्वीराज चव्हाणरक्तदान शिबिरास प्रतिसाद...

मलकापूर : ‘कोरोनासाठी देशात कोणत्याही राज्याने पॅकेज दिलेले नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मलकापूर पालिका आणि कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व कोरोनाच्या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, धनाजी काटकर, निवास थोरात, नगरसेवक सागर जाधव, आनंदराव सुतार, जयंत कुराडे, नगरसेविका गीतांजली पाटील, स्वाती तुपे, आनंदी शिंदे, पूजा चव्हाण, नंदा भोसले, विद्या थोरवडे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘प्रत्येक देशाने कर्ज काढले, नोटा छापल्या आणि कोरोनापासून बचावासाठी अब्जावधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र, देशातील मोदी सरकारने गेल्या लॉकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रूपाने तुटपुंजी मदत केली होती. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांना थेट मदत व्हावी अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी होती. मात्र, राज्य सरकारने ती मागणी मान्य करत थेट मदतीचे पॅकेज दिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक उत्सवाला सूट दिल्याने तिथे कोरोनाची परिस्थिती उद्भवली आहे. अशा उत्सवांना परवानगी देणे निषेधार्ह आहे. त्याला उत्तर प्रदेश व केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांचा ९६ हजारचा उच्चांक होता. आता तो एक लाख ८४ हजार म्हणजे दुपटीने वाढला आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाच्या वागणुकीची अपेक्षा नव्हती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रक्तदान शिबिरास प्रतिसाद...

रक्तदान शिबिरात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाहनचालकाने रक्तदान करत युवकांसमोर आदर्श ठेवला. तसेच रक्तदान करण्यासाठी शहरातील महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. पालिका पदाधिकाऱ्यांसह शहर व कऱ्हाड दक्षिणमधील युवकांनीही रक्तदान केले. यशवंत ब्लड बँकेचे डॉ. संदीप यादव यांच्यासह त्यांचा सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी केले.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाSatara areaसातारा परिसर