शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

टीका करणाऱ्या भाजपचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 12:06 IST

Prithviraj Chavan Bjp Congress Satata : ‘कोरोनासाठी देशात कोणत्याही राज्याने पॅकेज दिलेले नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देटीका करणाऱ्या भाजपचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला : पृथ्वीराज चव्हाणरक्तदान शिबिरास प्रतिसाद...

मलकापूर : ‘कोरोनासाठी देशात कोणत्याही राज्याने पॅकेज दिलेले नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा लोकांसमोर आला आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मलकापूर पालिका आणि कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व कोरोनाच्या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, धनाजी काटकर, निवास थोरात, नगरसेवक सागर जाधव, आनंदराव सुतार, जयंत कुराडे, नगरसेविका गीतांजली पाटील, स्वाती तुपे, आनंदी शिंदे, पूजा चव्हाण, नंदा भोसले, विद्या थोरवडे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘प्रत्येक देशाने कर्ज काढले, नोटा छापल्या आणि कोरोनापासून बचावासाठी अब्जावधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र, देशातील मोदी सरकारने गेल्या लॉकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रूपाने तुटपुंजी मदत केली होती. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांना थेट मदत व्हावी अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी होती. मात्र, राज्य सरकारने ती मागणी मान्य करत थेट मदतीचे पॅकेज दिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक उत्सवाला सूट दिल्याने तिथे कोरोनाची परिस्थिती उद्भवली आहे. अशा उत्सवांना परवानगी देणे निषेधार्ह आहे. त्याला उत्तर प्रदेश व केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांचा ९६ हजारचा उच्चांक होता. आता तो एक लाख ८४ हजार म्हणजे दुपटीने वाढला आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाच्या वागणुकीची अपेक्षा नव्हती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रक्तदान शिबिरास प्रतिसाद...

रक्तदान शिबिरात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाहनचालकाने रक्तदान करत युवकांसमोर आदर्श ठेवला. तसेच रक्तदान करण्यासाठी शहरातील महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. पालिका पदाधिकाऱ्यांसह शहर व कऱ्हाड दक्षिणमधील युवकांनीही रक्तदान केले. यशवंत ब्लड बँकेचे डॉ. संदीप यादव यांच्यासह त्यांचा सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी केले.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाSatara areaसातारा परिसर