शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

गुन्हे प्रतिबंध अन् उघडकीस आणणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:04 IST

आपल्या आजूबाजूला काय घडतंय, यावर प्रत्येकाचं लक्ष असायला हवं. पोलिसांचे कान, नाक, डोळा ही सर्वसामान्य जनताच आहे. - सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा.

ठळक मुद्देमुंबईतील डिटेक्शनचा अनुभव येणार कामी चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

दत्ता यादव।सातारा : नवी मुंबई आणि ठाणे येथील क्राईम ब्रँचमधील डिटेक्शनचा अनुभव पाठीशी असल्यामुळे साताऱ्यात काम करणे फार अवघड जाणार नाही. तेथील अनुभव इथे कामी येणार आहे. गुन्हे उघडकीस आणणे आणि गुन्हेगारांवर ्रवचक ठेवून त्यांच्यावर प्रतिबंध घालणे हे धोरण साताºयात राबविले जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याशी केलेली बातचित..

  • प्रश्न : स्थानिक गुन्हे शाखेच्या संदर्भात तुमचे धोरण काय असणार?

उत्तर : गुन्हे डिटेक्शनवर भर दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात गावोगावी खबऱ्यांचे नेटवर्क पुन्हा नव्याने उभारले जाणार आहे. तसेच गुन्हे घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे. गुन्हे उघडकीस आणताना त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. तर त्याची उकल होते. या धोरणाला प्राधान्य असेल.

  • प्रश्न : तुमच्या शाखेकडे कोणते गुन्हे सध्या डिटेक्शनसाठी आहेत?

उत्तर : अलीकडे आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. गुन्हे घडल्यानंतर त्याचा शोध लावण्यापेक्षा ते घडूच नयेत, यासाठी जनजागृतीद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मोठी अफरातफर असते. याचा बारकाईने तपास करावा लागतो. जिल्ह्यात खासगी सावकारीचेही प्रमाण दिसत आहे. हे रोखण्यासाठी कारवाईचे कडक धोरण अवलंबले जाणार आहे.

  • प्रश्न : एलसीबीकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ आहे का?

उत्तर : हो नक्कीच आहे. साताºयाची एलसीबीची टीम अत्यंत संवेदनशील आहे. या टीमचे नेटवर्क वाखाण्याजोगे आहे. तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या पद्धतीमुळे ही टीम क्रियाशील वाटते. कोणतेही काम टीमवर्कने केल्याने त्याचा आनंद घेता येतो. ही टीम नक्कीच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरेल. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे जाळे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.राष्ट्रपती पोलीस पदकही..पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे बार्शी, सोलापूरहून साताºयात आले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई, ठाणे, बारामती, पुणे या ठिकाणी उत्कृष्ट काम केले आहे. याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकही बहाल करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट डिटेक्शनमुळे पोलीस महासंचालकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मुंंबईसारख्या महानगरामध्ये काम करीत असताना त्यांनी ७५ रॉबरीपैकी ५३ गुन्हे उघडकीस आणले होते. इतरांचा तपास सुरू असून त्याला लवकरच यश येईल.

अकरा आरोपींना सक्तमजुरीची शिक्षाठाणे मध्यवर्ती बँकेतून सहा लाखांची रोकड चोरीस गेली होती. त्यामध्ये अकरा आरोपींना त्यांनी शिताफीने पकडले होते. या अकराही आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. तसेच हिंगोली जिल्ह्याातील वसमत हे पोलीस ठाणे अत्यंत सेंसिटिव्ह आहे. या ठिकाणीही पाटील यांनी काम केले आहे. विविध आंदोलने त्यांनी कसलीही हिंसा न होता उत्कृष्टरीत्या हातळली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस