शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरमांड धरणातील पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST

चाफळच्या पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर गमेवाडी गावाजवळ उत्तरमांड नदीवर धरणाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणामुळे चाफळपासून चरेगावपर्यंत शेतीचे ...

चाफळच्या पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर गमेवाडी गावाजवळ उत्तरमांड नदीवर धरणाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणामुळे चाफळपासून चरेगावपर्यंत शेतीचे नंदनवन झाले आहे. त्यातच या परिसरात गर्द झाडीमुळे विभागातील अनेक जण या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला येत असतात. तर धरणाच्या बाजूनेच पाडळोशी विभागाला जोडणारा मुख्य रस्ता गेला असून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. शिवाय सकाळी शुद्ध हवा मिळावी म्हणून या ठिकाणी तरुणांसह ग्रामस्थ व्यायामासाठी येतात. मात्र, विभागातील काही शेतकरी या ठिकाणी आपली मृत जनावरे धरण परिसरात आणून उघड्यावरच टाकत आहेत. हा कहर झाला असतानाच आता चक्क धरणाच्या पाण्यातच मृत गाय टाकल्याने धरणातील पाणी दूषित झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अगोदरच कोरोनाचे जाळे पसरत आहे. त्यातच या उघड्यावर टाकलेल्या मृत जनावरांच्या दुर्गंधीने रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.