शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जखमी ‘हरियाल’ला वाचविण्यात अपयश मदत न मिळाल्याने मृत्यू झाल्याची तक्रार

By admin | Updated: November 14, 2014 23:19 IST

या पक्ष्याला वाचविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेली मोठी धावपळ व्यर्थ ठरली.

सातारा : महाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेल्या ‘हरियाल’ पक्ष्याला जखमी अवस्थेत वेळेवर मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार, त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केली. महाविद्यालयाच्या जवळपास जखमी अवस्थेत सापडलेल्या या पक्ष्याला वाचविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेली मोठी धावपळ व्यर्थ ठरली. याबाबत हकीकत अशी, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील काही विद्यार्थी चहा घेण्यासाठी बाहेर आले. ‘एमपीएससी’चा अभ्यास करण्यासाठी हे विद्यार्थी रोज सकाळी महाविद्यालयात येतात. परिसरातील गर्द झाडीत त्यांना काही हालचाल दिसल्याने हे विद्यार्थी झाडीकडे गेले. जखमी अवस्थेत धडपडत असलेला हरियाल पक्षी त्यांना दिसला. गर्द झाडीत मोठ्या कष्टाने शिरून त्यांनी पक्ष्याला ताब्यात घेतले. या प्रयत्नात एका विद्यार्थ्याला काटेही लागले. पक्ष्याला घेऊन सचिन जाधव, अतुल जाधव, गुरुदेव फाळके, अशोक राठोड, गौरव जमदाडे, सचिन काळेल हे विद्यार्थी वनखात्याच्या गोडोली येथील कार्यालयात गेले. परंतु तेथील व्यक्तींनी डॉक्टर नसल्याचे सांगितले. पक्ष्याला घेऊन विद्यार्थी सरकारी पशुचिकित्सालयाकडे गेले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही आणि पक्ष्याचा मृत्यू झाला. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी किमान या पक्ष्याला ताब्यात घ्यायला हवे होते, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. वेळेत मदत न मिळाल्यानेच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांनी उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्याकडे केली. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी हरियाल पक्ष्याला गोडोली रोपवाटिकेत आणले तेव्हा तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. केवळ वनमजूर तेथे काम करत होते. ते या पक्ष्याला ताब्यात घेऊ शकत नाहीत. कर्मचारी असते, तर त्यांनी पक्ष्याला नक्की ताब्यात घेतले असते. - एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक, सातारा