शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

चारचाकी पलटी होऊन एक ठार, सहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 11:19 AM

सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत चारचाकी गाडी पलटीहून विलास राजाराम खरात ( वय ५२ ) (सध्या, रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले...

- संदीप कुंभार  मायणी : मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत चारचाकी गाडी पलटीहून विलास राजाराम खरात ( वय ५२ ) (सध्या, रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले, तर इतर सहा जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, खरात कुटुंबीय मुंबई येथून भिकवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे मुळगावी सुट्टी व यात्रेनिमित्त चारचाकी गाडीने  येत असताना आज बुधवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावर गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला बांधावर तीन ते चार पलट्या घेऊन पलटी झाली.

यामध्ये विलास राजाराम खरात ( वय ५२, सध्या रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले. जितेंद्र विलास खरात, संगीता विलास खरात, अंकिता विलास खरात, निकिता रोहन कांबळे, रोहन कांबळे व रुचिता रोहन कांबळे सर्व राहणार भिकवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे .

सदर घटनेच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व घटना पंचनामा करण्यात आला असून, मृत विलास खरात यांचे मृतदेह  शवविच्छेदन (कलेढोण ता.खटाव) येथील कुटीर रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .

चौकट :- मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्ग असूनही हा मार्ग एकेरी व खड्डा खड्ड्याचा असल्याने वर्षातून अनेक वेळा या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले असले तरी संबंधित विभागाकडून या मार्गाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे हा मार्ग दुहेरी होत चांगला हवा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात