शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आणणे हीच खरी शंकररावांना श्रध्दांजली

By admin | Updated: August 25, 2015 23:50 IST

रामराजे नाईक-निंंबाळकर : कोरेगाव येथील कार्यक्रमात पाणीप्रश्नी एकत्र येण्याचे आवाहन

कोरेगाव : ‘दुष्काळी भागातील पाणी प्रश्नाकडे दिवंगत शंकरराव जगताप यांनी राजकीय प्रश्न म्हणून कधीच पाहिले नाही. त्यांना पाणी प्रश्नाची ओढ होती. सर्वांनी पक्ष विरहीत आणि गट-तट विसरुन एकत्रित येऊन पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल,’ असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप यांचा तृत्तीय पुण्यस्मरण दिन कोरेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुनीता जगताप होत्या. आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील, उपाध्यक्ष भीमराव पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अर्जून वीर, छत्रपती संभाजी महाराज समुहाचे प्रमुख सुरेश साळुंखे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शहाजी भोईटे उपस्थिते होते. रामराजे म्हणाले, ‘खरे तर शंकरराव जगताप हे आमच्या वडिलांचे मित्र, त्यांना जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना पहिल्यांदा पाहिले होते. १९९५ मध्ये सर्वात पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्याशी परिचय झाला. त्यांनी आम्हाला बरोबरीने वागविले. पाणी या विषयावर आमचे ते नाते जडले. त्यांनी वैचारिक धनाची शिदोरी प्रत्येकाला दिली. त्यांचे दुष्काळी भागातील पाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊ या. आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिवंगत शंकरराव जगताप यांच्या दुष्काळातील पाझर तलाव निर्मिती आणि रस्त्यांच्या जाळ्यांचे कौतुक करत, असा आमदार होणे नाही, असे स्पष्ट केले. अण्णांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले.’ अ‍ॅड. सुनीता जगताप म्हणाल्या, ‘आण्णांना नेहमी दुष्काळी भागाची काळजी होती. त्यांनी विविध पदे भूषविली, मात्र त्यामध्ये दुष्काळी जनतेची कामे करण्याकडे पुढाकार होता. त्यांनी पाझर तलाव निर्मिती, रस्ते या मूलभूत गरजांसह कोरेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत ज्ञानगंगोत्री खेडोपाडी पोहोचविली. गरिबांच्या मुलांना अग्रक्रमाने शिक्षण दिले. शिक्षण संस्था चालविताना, त्यांना किती अडचणी आल्या, याचा विचार केला तर मन हेलावून जाते.’ भीमराव पाटील यांनी प्रास्ताविकात आण्णांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका विषद केली. प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे खजिनदार दत्तात्रय महाजन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)