शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चोराच्या वाडीत ‘आनंदा’चा ‘पूर’

By admin | Updated: February 4, 2015 00:06 IST

सरकार दरबारी नावबदल : गावकऱ्यांच्या वीस वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश

सातारा : आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून हिणवावं, असं कोणाला वाटेल बरे! पण हे दुखरं सत्य गेली वीस वर्षांपासून आपल्या काळजात घेऊन वावरणारं एक गाव वाई तालुक्यात काल-परवापर्यंत होतं. ‘चोराची वाडी’ या नावानं गावकऱ्यांची अक्षरश: झोपमोड केली होती. मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर, सातबारावर तसेच इतर शासकीय कागदपत्रांवर ‘चोराची वाडी’ असा उल्लेख असल्यामुळे गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होते. गावाचं नाव बदल्यासाठी गावकरी वीस वर्षांपासून धडपडत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् आता ‘चोराची वाडी’ ही आता ‘आनंदपूर’ नावानं ओळखली जाणार असल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला जणू भरतं आलं आहे.वाई तालुक्यातील चोराची वाडी गावाची कथा मोठी मजेशीर आहे. गावाला चोराची वाडी हे नाव कसं मिळालं, याबद्दल सरपंच अंकुश सकपाळ यांनी सांगितलं की, खंडाळा तालुक्यातील सध्याच्या वाठार कॉलनी येथील साळुंखे आडनावाची काही कुटुंबं याठिकाणी वास्तव्यास आली. त्यांचे पूर्वीचे आडनाव ‘चोर’ असे होते. आजही वाठार कॉलनी या गावाला ‘चोराचे भादे’ नावाने ओळखले जाते. ‘चोर’ आडनावांच्या कुटुंबांची संख्या जास्त असल्यामुळे या वाडीला ‘चोराची वाडी’ असे संबोधले जाऊ लागले. हीच ओळख आजपर्यंत कायम होती. जुने दाखले, शेतीचे उतारे पाहिले तर आजही ‘चोराची वाडी’ असा उल्लेख आढळतो. लोक आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून ओळखत असल्याने जास्त अपमानास्पद वाटत होते. सरकारी कागदोपत्री तसेच पत्ता सांगतानाही ‘चोराची वाडी’ हा उल्लेख गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होता. केवळ नावामुळं आपल्या गावाची बदनामी होते, असं ग्रामस्थांना मनापासून वाटत होते. त्यामुळे गावाची ही ओळख पुसली पाहिजे, यासाठी वीस वर्षांपूर्वी गावाने एकत्र येऊन ठराव केला होता. मात्र, शासकीय पातळीवर पाठपुरावा होत नव्हता. मात्र, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांनी याकामी पुढाकार घेतला. पवार यांनी गावाच्या नावात बदल व्हावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर पुढे वाई पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सभेत हा ठराव मंजूर करून घेण्यात आला. एक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ७ जानेवारी २०१५ रोजी ग्रामपंचायतीला सामान्य प्रशासन मंत्रालयातून गावाचे नाव बदलण्यात आल्याचे पत्राने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गावाच्या नावात बदल व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर वर्षभरापासून प्रयत्न केले. यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सहकार्य केले. शासकीय कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होऊन नुकतेच गॅझेटही झाले आहे. यापुढे चोराची वाडी’ हे गाव ‘आनंदपूर’ या नावाने ओळखले जाईल, हे मोठे यश आहे.- शशिकांत पवार, सदस्य, जिल्हा परिषद, सातारामुलांच्या दाखल्यावर चोराची वाडी, खाते उताऱ्यावर चोराची वाडी, सातबारावर चोराची वाडी.... या उल्लेखामुळं अपमानास्पद वाटत होतं. मुलांना शाळेत लाजिरवाणं वाटायचं. ही ओळख कायमची पुसली जावी आणि गावाला चांगल्या नावानं ओळखलं जावं, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ‘आनंदपूर’ नावामुळं गाव आनंदी झालं आहे. - अंकुश सकपाळ, सरपंचपै-पाहुण्यात हसं‘चोराची वाडी’ हे बोचरं नाव मनाला सतत वेदना देत होतं. पै-पाहुण्यांतही होणारं हसं अन् ओळखी-पाळखीच्यांकडून सतत होणारी मस्करी यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू मावळला होता. यासाठीच की काय ग्रामस्थांनी ‘चोराची वाडी’चं नाव बदलून ‘आनंदपूर’ ठेवण्याचं योजलं होतं. शासकीय कागदोपत्री गावाचं नाव आता बदलल्यामुळं साऱ्या गावात नावाप्रमाणेच ‘आनंदा’चा जणू ‘पूर’ आल्याचं वातावरण निर्माण झालं आहे.