शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

सचिन काकडे गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो ...

सचिन काकडे

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे नियोजन केले जाते. अलीकडच्या काही वर्षांत विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय महत्त्वाचा ठरू लागला आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी ही तळी महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी केवळ आणि केवळ नागरिकांच्या भावनेखातर प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च या तळ्यांवर करावा लागत आहे.

सातारा शहराचा विचार करायचा झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहा दिवसांच्या धामधुमीनंतर गणेशमूर्ती शहरातील ऐतिहासिक तळी, नदी अथवा विहिरींमध्ये विसर्जित केल्या जायच्या. मात्र पर्यावरणाची होणारी हानी व जलप्रदूषण टाळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून नदी, विहिरी यांची जागा कृत्रिम तळ्यांनी घेतली. जुनी तळी विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आली. काही तरी नागरिकांनी कचरा टाकून इतकी घाण केली की त्यांचा वापर भविष्यात होईल की नाही हे सांगता येत नाही.

गणेशोत्सव आला की कृत्रिम खेळांचे खोदकाम करणे, त्यात पाणीसाठा करणे, दीड, पाच दिवस सात व दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे असा प्रशासनाचा दिनक्रम सुरू होतो. सातारा शहरात दरवर्षी कृत्रिम तळ्यांवर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च केला जातो. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर पालिकेला विसर्जन व्यवस्थेवर तब्बल दीड कोटींहून अधिक रुपये खर्च करावे लागले आहेत. इतक्या मोठ्या रकमेतून कायमस्वरूपी तळ्याचीदेखील उभारणी झाली असती. मात्र नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षी कृत्रिम तळ्यांची उभारणी करावी लागते. परंतु हे असं आणखी किती वर्षे चालणार आहे. विसर्जनासाठी नागरिकांनी, प्रशासनाने सक्षम पर्याय शोधायला हवा. अनेक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे तळ्यांमध्ये नव्हे, तर घरच्या घरी विसर्जन करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ही चळवळ जर व्यापक झाली, तर अनेक प्रश्न आपोआपच सुटू शकतील.

(चौकट)

... तर कोट्यवधींचा खर्च वाचेल :

- जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून विहिरी, तलाव व नदीमध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.

- मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे जलप्रदूषण तर होतेच शिवाय जलचरांवरदेखील मोठा परिणाम होतो.

- हे रोखण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती कृत्रिम तळ्यांची उभारणी करत आहे. ठिकठिकाणी मूर्ती दान उपक्रमही राबविला जातो.

- केवळ प्रदूषण रोखणे हा यामागचा उद्देश असला, तरी नागरिकांच्या भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाला कृत्रिम तळ्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत

- मूर्तींचे आपण घरच्या घरी विसर्जन केले अथवा एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तीन ते पाच वर्ष विसर्जित केली नाही, तर हा खर्च वाचू शकतो.

फोटो : जावेद खान