शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन; राज्यातील संगणक परिचालकाच्या साताऱ्यातील आंदोलनाला १८ व्या दिवशी ब्रेक

By नितीन काळेल | Updated: February 2, 2024 18:43 IST

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे 

सातारा : मानधन नको, वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील संगणक परिचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर १८ व्या दिवशी साताऱ्यातील आंदोलन मागे घेतले. तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनीही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. आता मागण्या मान्य झाल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारपासून सर्वजण कामावर हजर होणार आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आणि राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेसमोर दि. १६ जानेवारीपासून आंदोलन सुरू झाले होते. यामध्ये राज्यातील शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा.कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनी उपोषण सुरू केलेले.दरम्यान, गुरुवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी मानधनवाढ आणि संबंधित कंपनी बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे साताऱ्यातील राज्यव्यापी आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. तसेच अध्यक्षा सुनीता आमटे यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून साताऱ्यात; महिलांचा सहभाग अधिक..साताऱ्यातील संगणक परिचालकांचे हे आंदोलन राज्यव्यापी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणात अधिक करुन महिला संगणक परिचालकांचा समावेश असल्याचे दिसून आले. आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धारच परिचालकांनी केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास होता. त्यामुळे मुंबईत त्यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटले. त्यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवून शब्द दिला आहे. त्यामुळे आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मागण्या मान्य केल्याने मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलनस्थळी येणार नाही असा शब्द दिलेला. मागण्या मान्य झाल्यानंतरच दोघेही आंदोलनस्थळी आले व आपला शब्द पाळला. त्यांचेही आभारी आहोत. आता सोमवारपासून आम्ही कामावर जाणार आहे. - सुनीता आमटे, राज्यध्यक्षा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन