शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

मृत्यूनंतर त्यांना रक्ताच्या नात्यानेही नाकारले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:37 IST

सातारा : घरातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला की आख्खं कुटुंब शोकसागरात बुडून जातं. त्याच्यावर विधिवत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात; ...

सातारा : घरातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला की आख्खं कुटुंब शोकसागरात बुडून जातं. त्याच्यावर विधिवत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात; परंतु कोरोनामुळे रक्ताची नाती दुरावू लागली असून, अशा मृतांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबातील एक व्यक्तीही स्मशानभूमीत फिरकत नाही. या निष्ठुर व्यक्तींमुळे पालिका कर्मचारीच मृतांच्या नातेवाइकाची भूमिका बजावत आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांबरोबरच मृतांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. अशा मृतांवर साताऱ्यातील संगममाहुली येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रशासनाने ही जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविली आहे. पालिकेचे कर्मचारी वर्षभरापासून हे काम मोठ्या हिमतीने पार पाडत असून, आजपर्यंत त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभवही आले आहेत.

कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या मृतांपैकी काही नागरिक घरातील सदस्याचे शेवटचे दर्शन व्हावे म्हणून खूप धडपडत असतात. काहीजण अंत्यसंस्कारांना हजेरी लावतात; तर दुसरीकडे असे अनेक नातेवाईक आहेत, जे स्मशानभूमीकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनाच अशा मृतांच्या नातेवाइकाची भूमिका बजावावी लागत आहे. घरातील ज्या सदस्याच्या सान्निध्यात आपण लहानाचे मोठे झालो, ज्याच्या अंगाखांद्यावर आपण वाढलो, अशा व्यक्तीचा शेवट असा होणं, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं?

(चौकट)

नातेवाइकांची भूमिका

सातारा पालिकेच्या पथकाने आतापर्यंत १८०० कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यांपैकी पाचशेहून अधिक मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारांसाठी आलेच नाहीत. अशा मृतांवर कर्मचाऱ्यांना नातेवाइकांच्या भूमिकेतून अंत्यसंस्कार करावे लागले.

(चौकट)

पाच माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही

कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला शासनाने पाच सदस्यांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अनेकजण भीतीपोटी अंत्यसंस्कारांना येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या आयुष्याचा शेवटही इतका निर्दयी होत आहे.

(कोट)

वर्षभरापासून मी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारांचे काम करीत आहेत. वर्षभरात अनेक वाईट अनुभव आले. मृताला अग्नी देणे तर दूरच; त्याच्या शेवटच्या दर्शनाला घरातील एक सदस्य न येणं यापेक्षा मोठं दु:ख काय असू शकतं?

- कपिल मट्टू, कर्मचारी

(कोट)

एकवेळ दगडाला पाझर फुटेल; पण काही व्यक्ती इतक्या निष्ठुर झाल्या आहेत की त्यांना कधीच पाझर फुटणार नाही. जेव्हा गरज आहे तेव्हाच रक्ताची नाती साथ सोडत आहेत.

- लक्ष्मण कांबळे, कर्मचारी

(पॉइंटर)

७५ टक्के रुग्णांवर पालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू : २४००

पालिका कर्मचाऱ्यांनी केलेले अंत्यविधी : १८००

(डमी न्यूज)