शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
2
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
3
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
4
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
5
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
6
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
7
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
8
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
9
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
10
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
11
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
12
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
13
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
14
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
15
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
17
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
18
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
19
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
20
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Satara: कोयनेत दीड महिन्यात ६३ टीएमसी पाण्याची आवक, आतापर्यंत पाण्याचा विसर्ग किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:33 IST

यावर्षी पाऊस चांगला; २३९४ मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान अधिक असल्याने मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वेगाने वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातही दीड महिन्यात जवळपास ६३ टीएमसी पाण्याची आवक झाली. तर साडे तीन टीएमसी पाणी विसर्गाद्वारे सोडण्यात आलेले आहे. सध्या कोयना धरणात ७७ टीएमसीवर साठा असून आतापर्यंत २ हजार ३९४ मिलिमीटर पर्जन्यमानाचीही नोंद झालेली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. पण, पश्चिम बाजुला पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. पश्चिमेकडे पावसाने अजून विश्रांती घेतलेली नाही. एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे मागीलवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. विसर्ग होऊनही गुरूवारी सकाळच्या सुमारास या सहा धरणांमध्ये १११ टीएमसीवर पाणीसाठा होता. सुमारे ७५ टक्के ही धरणे भरलेली आहेत.गुरूवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २० तर नवजाला ४१ आणि महाबळेश्वरमध्ये १९ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला २ हजार ३९४, नवजा २ हजार ३२७ आणि महाबळेश्वर येथे २ हजार ३६८ मिलिमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. सकाळच्या सुमारास धरणात १२ हजार ६०२ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७७.४० टीएमसी झालेला. ७३.५४ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. धरणाचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेक विसर्ग हाेत आहे. हे पाणी कोयना नदीद्वारे जात आहे.दरम्यान, सातारा शहरात मंगळवारपासून पावसाची उघडीप आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले. तर गुरूवारीही पाऊस पडला नाही. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतही पावसाची उघडीप कायम आहे.पायथा वीजगृहातून सव्वा तीन टीएमसी सोडले पाणी..कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला. त्यानंतर १५ जूनपासून धरणात पाण्याची आवक होऊ लागली. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर आवक वेगाने वाढत गेली. तसेच पाणीसाठाही वाढला. त्यामुळे २० जून रोजी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १ हजार ५० विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसरे युनिट सुरू करून विसर्ग वाढवला. तर दोन दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर गेल्यानंतर सहा दरवाजातून विसर्ग सुरू केला. एक जून ते १६ जुलै या कालावधीत धरणात एकूण ६२.५० टीएमसी पाणी आवक झालेली आहे. तर पायथा वीजगृहातून ३.२० टीएमसी आणि दरवाजातून ०.२० टीएमसी पाणी विसर्ग करण्यात आलेला आहे.