शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयनेत दीड महिन्यात ६३ टीएमसी पाण्याची आवक, आतापर्यंत पाण्याचा विसर्ग किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:33 IST

यावर्षी पाऊस चांगला; २३९४ मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान अधिक असल्याने मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वेगाने वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातही दीड महिन्यात जवळपास ६३ टीएमसी पाण्याची आवक झाली. तर साडे तीन टीएमसी पाणी विसर्गाद्वारे सोडण्यात आलेले आहे. सध्या कोयना धरणात ७७ टीएमसीवर साठा असून आतापर्यंत २ हजार ३९४ मिलिमीटर पर्जन्यमानाचीही नोंद झालेली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. पण, पश्चिम बाजुला पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. पश्चिमेकडे पावसाने अजून विश्रांती घेतलेली नाही. एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे मागीलवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. विसर्ग होऊनही गुरूवारी सकाळच्या सुमारास या सहा धरणांमध्ये १११ टीएमसीवर पाणीसाठा होता. सुमारे ७५ टक्के ही धरणे भरलेली आहेत.गुरूवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २० तर नवजाला ४१ आणि महाबळेश्वरमध्ये १९ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला २ हजार ३९४, नवजा २ हजार ३२७ आणि महाबळेश्वर येथे २ हजार ३६८ मिलिमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. सकाळच्या सुमारास धरणात १२ हजार ६०२ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७७.४० टीएमसी झालेला. ७३.५४ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. धरणाचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेक विसर्ग हाेत आहे. हे पाणी कोयना नदीद्वारे जात आहे.दरम्यान, सातारा शहरात मंगळवारपासून पावसाची उघडीप आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले. तर गुरूवारीही पाऊस पडला नाही. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतही पावसाची उघडीप कायम आहे.पायथा वीजगृहातून सव्वा तीन टीएमसी सोडले पाणी..कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला. त्यानंतर १५ जूनपासून धरणात पाण्याची आवक होऊ लागली. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर आवक वेगाने वाढत गेली. तसेच पाणीसाठाही वाढला. त्यामुळे २० जून रोजी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १ हजार ५० विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसरे युनिट सुरू करून विसर्ग वाढवला. तर दोन दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर गेल्यानंतर सहा दरवाजातून विसर्ग सुरू केला. एक जून ते १६ जुलै या कालावधीत धरणात एकूण ६२.५० टीएमसी पाणी आवक झालेली आहे. तर पायथा वीजगृहातून ३.२० टीएमसी आणि दरवाजातून ०.२० टीएमसी पाणी विसर्ग करण्यात आलेला आहे.