शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

Satara: कोयनेत दीड महिन्यात ६३ टीएमसी पाण्याची आवक, आतापर्यंत पाण्याचा विसर्ग किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:33 IST

यावर्षी पाऊस चांगला; २३९४ मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान अधिक असल्याने मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वेगाने वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातही दीड महिन्यात जवळपास ६३ टीएमसी पाण्याची आवक झाली. तर साडे तीन टीएमसी पाणी विसर्गाद्वारे सोडण्यात आलेले आहे. सध्या कोयना धरणात ७७ टीएमसीवर साठा असून आतापर्यंत २ हजार ३९४ मिलिमीटर पर्जन्यमानाचीही नोंद झालेली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. पण, पश्चिम बाजुला पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. पश्चिमेकडे पावसाने अजून विश्रांती घेतलेली नाही. एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे मागीलवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. विसर्ग होऊनही गुरूवारी सकाळच्या सुमारास या सहा धरणांमध्ये १११ टीएमसीवर पाणीसाठा होता. सुमारे ७५ टक्के ही धरणे भरलेली आहेत.गुरूवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २० तर नवजाला ४१ आणि महाबळेश्वरमध्ये १९ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला २ हजार ३९४, नवजा २ हजार ३२७ आणि महाबळेश्वर येथे २ हजार ३६८ मिलिमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. सकाळच्या सुमारास धरणात १२ हजार ६०२ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७७.४० टीएमसी झालेला. ७३.५४ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. धरणाचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेक विसर्ग हाेत आहे. हे पाणी कोयना नदीद्वारे जात आहे.दरम्यान, सातारा शहरात मंगळवारपासून पावसाची उघडीप आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले. तर गुरूवारीही पाऊस पडला नाही. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतही पावसाची उघडीप कायम आहे.पायथा वीजगृहातून सव्वा तीन टीएमसी सोडले पाणी..कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला. त्यानंतर १५ जूनपासून धरणात पाण्याची आवक होऊ लागली. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर आवक वेगाने वाढत गेली. तसेच पाणीसाठाही वाढला. त्यामुळे २० जून रोजी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १ हजार ५० विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसरे युनिट सुरू करून विसर्ग वाढवला. तर दोन दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर गेल्यानंतर सहा दरवाजातून विसर्ग सुरू केला. एक जून ते १६ जुलै या कालावधीत धरणात एकूण ६२.५० टीएमसी पाणी आवक झालेली आहे. तर पायथा वीजगृहातून ३.२० टीएमसी आणि दरवाजातून ०.२० टीएमसी पाणी विसर्ग करण्यात आलेला आहे.