शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

३८ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ २६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश ...

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले तर १२ मुलींचा अद्यापही शोध सुरू आहे. कोरोना काळात अनेक निर्बंध आल्याने अल्पवयीन मुली घरातच लाॅक झाल्या. बाहेर फिरण्यावर बंधने आल्याने या वर्षी मुली बेपत्ता होण्याचा आकडा कमी आहे.

अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. बहुतांश प्रकरणांत महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते. दरम्यान, पालकांसोबत न गेलेल्या अल्पवयीन मुलींना शासकीय निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातून मुलींसोबतच ८९ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील २९ मुलांचा समावेश आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यातून पलायन केलेल्या २४ मुलींपैकी १५ मुलींचा शोध लागला आहे. तर उर्वरित मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोना व लाॅकडाऊन यामुळे मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण किंचित घटले आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्हा व इतर राज्यांत तपासाला जायला अडचणी येऊ लागल्या. राज्य सोडून जायचे असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. कोरोना काळात बस व रेल्वे सेवा बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही मुलींकडे मोबाइलच नसल्याने तपासाच्या दृष्टिकोनातून आणखी अडचणी निर्माण होऊ लागल्या

चाैकट : मुली चुकतात कुठे?

चांगले - वाईट ओळखा

वयाच्या १४ व्या वर्षापासून चांगले काय वाईट काय, याची समज मुलींना असते. सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या घरातील वातावरण व बाहेरील वातावरण याचा परिणाम मुलींवर होतो. या वयात मुली मैत्रिणींचेच जास्त ऐकतात. कुटुंबीयांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

चाैकट : मोबाइल कमी वापरा

मुलींनी मोबाइलचा वापर कमी करावा. आई-वडील यांच्याशी पालक यापेक्षा मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. बाहेर जे काही घडत असेल ती प्रत्येक गोष्ट घरी सांगितली पाहिजे. नेमके हेच मुलींकडून होत नाही. बाहेर काही चुकीचे घडले असेल तर भीतीपोटी मुली घरी सांगत नाहीत. उलट सांगितले तर पुढची संकटे टाळता येतात.

चाैकट : हे आहे उदाहरण..

सातारा शहरातील एका प्रकरणात मुलीची ओळख पेठेतील मुलासोबत झाली. त्यातून मैत्री झाली. या मैत्रीतून बाहेर फिरणे सुरू झाले. मुलीच्या मनात किंचितही वाईट हेतू नव्हता. मुलाने दोघे एकत्र असल्याचे फोटो काढले. पुढे हेच फोटो दाखवून तो मुलीला ब्लॅकमेल करू लागला. एवढेच नव्हेतर, त्या मुलाने मुलीवर अत्याचारही केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. त्या वेळी हा प्रकार समाेर आला. ही घटना घडण्यापूर्वीच जर मुलीने घरातल्यांना हा प्रकार सांगितला असता तर हे संकट ओढवले नसते.

चाैकट : मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले-वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.

अल्पवयीन मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या तरी त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एखाद्या मुलाचे - मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.

वयाच्या १५ वर्षांनंतर मुला - मुलीमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे. ऑनलाइन अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल जास्त वापरू नये. त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.