शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

सांगलीच्या सिंचनासाठी कोयनेतून ३५०० क्यूसेक विसर्ग, धरणात शिल्लक पाणीसाठा किती.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: April 23, 2025 19:26 IST

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातून बुधवारी दुपारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या ...

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातून बुधवारी दुपारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या ३ हजार ५०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर धरणात ४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून तो ३१ मे पर्यंत पुरवावा लागणार आहे.जिल्ह्यात मागीलवर्षी वार्षिक सरासरीच्या सुमारे १२० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला होता. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे कोयना धरण ओव्हरफ्लो झाले. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या या कोयना धरणावरच अनेक गावांची तहान भागत आहे. तसेच हजारो हेक्टर शेतीलाही पाणी मिळते. या धरणातील पाण्याची अधिक करुन तरतूद ही सांगली जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे दरवर्षीच सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी होते. त्याप्रमाणे धरण व्यवस्थापनकडून पाणी विसर्ग केला जातो. मागील साडे चार महिन्यापासून सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पाणी सोडले जात आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली आहे.सध्या कडक उन्हाळा असल्याने पाणी टंचाई वाढत चालली आहे. त्यातच नुकतीच सांगली पाटबंधारे विभागाने काेयना धरणातून आणखी पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानुसार धरणातून बुधवारी दुपारपासून नदी विमोचकातील विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे आता विमोचकातून १ हजार ४०० क्यूसेक विसर्ग नदीत होत आहे. हे पाणी कोयना नदीतून जाणार आहे. तसेच भविष्यातही सांगलीकडून पाणी मागणी वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाप्रमाणे कोयना धरणातून विसर्ग करावा लागणार आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजना अवलंबून..कोयना धरणातील पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन सिंचन योजनांसाठीही पाण्याची तरतूद आहे. कोयना धरणातील सर्वाधिक पाण्यावर सांगली जिल्ह्याचा हक्क आहे. त्यामुळे तरतूद आणि मागणीनुसार पाणी सोडावे लागते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीDamधरणWaterपाणीKoyana Damकोयना धरण