शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांनी बिल भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

सातारा : राज्यात सध्या विजेची थकित बिल वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असून, कृषिपंपधारक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू लागलाय. पण, ...

सातारा : राज्यात सध्या विजेची थकित बिल वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असून, कृषिपंपधारक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू लागलाय. पण, सातारा जिल्ह्यात थोड्याच शेतकऱ्यांची वीज तोडली असून, थकित बिल भरण्यासाठी त्यांना आवाहन करण्यात येत आहे. यामुळे २५ हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरून सहकार्य केले आहे. जिल्ह्यात कृषी वीज धोरणानुसार कृषिपंप थकित वीजबिल ६६६ कोटी आहे.

कृषिपंपधारकांना ३,५,१० अशा अश्वशक्तीनुसार कृषिपंपाचे बिल आकारले जाते. जिल्ह्यात कृषिपंपधारकांची संख्या जवळपास पावणेदोन लाखांहून अधिक आहे. यामध्ये मागील पाच वर्षांपासून थकीत असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. असे असलेतरी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. कंपनीचे कर्मचारी गावोगावी जाऊन जागृती करत आहेत. त्यासाठी ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. याद्वारे शासनाच्या कृषिधोरण योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा फायदाही होताना दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागलाय.

शासनाच्या कृषी धोरणानुसार थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरायची आहे. तसेच शासनाकडून सवलतीवरील व्याज व दंड माफ करण्यात येत आहे. यामुळे ६० टक्के रक्कम भरायची असते, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर कृषी वीज धोरणानुसार ६६६ कोटी रुपयांची वीजबिलाची थकबाकी असलीतरी कृषी वीज धोरणाचा फायदा घेतल्यास त्यातील अर्धी रक्कम कमी होऊ शकते.

जिल्ह्यात कृषिपंपचालक

१,८१,५६०

वीजबिल थकबाकी

६६६.६२ कोटी

तालुकानिहाय कृषिपंपचालक आणि थकबाकी (कोटीत)

जावळी ३५१४ ४.४८

कऱ्हाड २८९५४ १२१.७०

खंडाळा ९०४१ २२.८६

खटाव २९२९७ १०७.९४

कोरेगाव २५१९१ १००.१३

महाबळेश्वर १७९५ १.४४

माण २०२७८ ७३.८७

पाटण ५०१६ १५.८६

फलटण २९४०० १२३.४२

सातारा १७५७९ ७२.४७

कोट :

जिल्ह्यात कृषिपंप थकित वीजबिल भरण्याबाबत महावितरणकडून तगादा सुरू होता. त्यामुळे शासनाच्या कृषी वीज धोरणानुसार थकबाकी रक्कम भरण्यात आली. त्यामुळे बिलात सवलत मिळाली. तसेच शेतीचा वीजपुरवठाही सुरळीत राहिला आहे.

- राजाराम पाटील

...........

मागील दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान झाले. तरीही वीज मोटारीचे बिल भरावेच लागत आहे. बिल भरले नाही तर तोटाच होणार आहे. शासनाने वीज मोटारीचे संपूर्ण बिल माफ करायला हवे होते.

- परशुराम पवार

.................

अन्यायकारक वीजबिल वसुलीविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. खंडणी वसूल केल्यागत वसुली सुरू केली आहे. ती तातडीने थांबवली पाहिजे. मीटर तपासून बिल देणारी एजन्सी नसताना अदांजे खोटी बिले तयार केली व वितरीत करून काही अंशी वसुली केली. ही बाब फौजदारी गुन्ह्याची आहे.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

..................

मागील पाच वर्षांपासून कृषिपंपाचे वीजबिल थकीत असणाऱ्या काही जणांवर कारवाई केली आहे. मात्र, शासन कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांना आवाहन करून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २५ हजार शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरले आहे. शेतकऱ्यांनी यापुढेही सहकार्य करावे.

- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी, सातारा