शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

राज्यातील १५ टीमएमसी पाणी रुतून बसलेय धरणांमधील गाळात, साताऱ्यात 'गाळमुक्त धरण'ची कामे युद्धपातळीवर सुरू

By दीपक देशमुख | Updated: March 13, 2024 13:41 IST

दोन महिन्यांत ५८ लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट

दीपक देशमुख

सातारा : यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती असून गाळामुळे धरणांची साठवण क्षमताही कमी झाली आहे. राज्यातील विविध जलसाठ्यांमध्ये ४४ कोटी घनमीटर गाळ साचला आहे. यामुळे १५.५४ टी.एम.सी.ने साठवण क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्याच्या विविध धरणांतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने युद्धपातळीवर गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी २३.५० कोटींच्या विविध ७५ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हा गाळ काढल्यानंतर पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.राज्याप्रमाणे सातारा जिल्ह्यांतील धरणांतही मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. परंतु, कोयना व कण्हेर धरणवगळता इतर धरणांचे गाळ सर्वेक्षण झालेले नाही. कोयना धरणातील गाळाचे सर्वेक्षण २०२१ मध्ये झाले हाते. मात्र, धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यातच पाटण तालुक्यात भूस्खलनामुळेही धरणातील गाळाचे प्रमाण वाढतच आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरण लगेच भरत असल्याने धरणांची मूळ साठवण क्षमता पुन्हा स्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच दृष्टीने जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागाने युद्धपातळीवर माेहीम हाती घेतली आहे.त्यानुसार जिल्ह्यात धरण, तलाव, पाझर तलाव, बंधारे अशा जलसाठ्यांतील गाळ काढण्याच्या ७५ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामासाठी २३ कोटी ५० लाख २५ हजार ७९२ इतका खर्च येणार आहे. कोयना धरणातील संपूर्ण गाळ काढल्यास साठवण क्षमता किमान १० टीएमसीनने साठवण क्षमता वाढू शकते. परंतु, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवावी लागणार आहे.

कोयना धरणात १३ ठिकाणी गाळ काढण्यास मंजुरी

  • कोयना धरणातील दरे तांब, बामणोली, दाभे, देवळी, झांजवड, दरे तांब भाग २, वाघळी, तेटली, मजरे शेंबडी, शेंबडी, मुनावळे, रामेघर, सावरी अशा तेरा ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
  • त्याचप्रमाणे राजेवाडी मध्यम प्रकल्प, धुमाळवाडी, राणंद, नेर, पिंगळी, वाखरी, ढवळ, विंचुर्णी, जाशी, बाणगंगा, मांडवे, चाळकेवाडी यासह अनेक गावांतील तलाव, पाझर तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यात येणार आहे.
  • जलसंपदा, मृद व जलसंधारण, जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग यांच्या अखत्यारीत सर्व जलसाठे असून जलसंपदा विभागातील प्रकल्पातूनच सर्वाधिक गाळ काढण्याची कामे होत आहेत.
  • स्थानिक शेतकऱ्यांचाही सहभाग या योजनेत घेण्यात येणार असून गाळ नेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

दोन महिन्यांत ५८ लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्टयेत्या दोन ते अडीच महिन्यांत या ७५ कामांतून ५८ लाख ७ हजार १२९ घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. तथापि, कोयना धरणातील गाळ काढण्याच्या कामांना आणखी जास्त अवधीची आवश्यकता भासू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळ