शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निधी रखडल्याने टेंभू योजना बंद

By admin | Updated: February 19, 2015 23:41 IST

राज्य सरकारकडून दुर्लक्ष : पाच कोटींच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित

प्रताप महाडिक -कडेगाव - टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेचा वीज पुरवठा, पाच कोटींच्या थकित वीज बिलामुळे खंडित करण्यात आला आहे. यापैकी ३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी राज्य शासनाकडून टंचाई उपाययोजना निधीतून मिळणार आहे. शिवाय १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी शेतकऱ्यांच्या नियमित पाणीपट्टी वसुलीतून भरायची आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून ही पाणीपट्टी रक्कम कपात करुन तात्काळ भरण्याची व्यवस्था होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेला टंचाई उपाययोजना निधी कधी मिळणार?, असा संतप्त सवाल लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत.
टेंभू योजनेची टप्पा क्रमांक १ अ, १ ब तसेच शिवाजीनगर टप्पा क्रमांक २ मधील पाच कोटी इतकी वीजबिल थकबाकी आहे. या पट्ट्यांच्या लाभक्षेत्रात जवळपास ४ हजार २०० हेक्टर शेतजमिनीला पाणी दिले जाते. योजनेचे यावर्षी एक आवर्तन पूर्ण क्षमतेने दिले आहे. या एका आवर्तनाची १ कोटी ७५ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातूनच वसूल होत आहे. परंतु शासनाकडे अडकलेल्या निधीचे काय?
आता टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची वीजबिल थकबाकी असल्यामुळेच योजना बंद आहे. शासनाने टेंभू योजनेत ३ कोटी १५ लाख रुपये इतकी टंचाई काळातील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. याशिवाय ताकारी आणि म्हैसाळचीही तरतूद केली आहे. परंतु प्रत्यक्ष रक्कम जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे वर्ग होण्यास विलंब होत आहे. पहिल्या आवर्तनावेळी सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळीच तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी, टंचाई काळातली थकबाकी लवकरच भरणार आहोत, असे हमीपत्र महावितरणला दिले होते. परंतु अद्याप ही रक्कम प्राप्त झालेली नाही.
शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी तात्काळ वसूल होते. मात्र शासनच त्यांच्याकडील निधी देण्यास विलंब करीत आहे. यामुळे टेंभू योजना बंद आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन टंचाई उपाययोजना निधीची रक्कम संबंधित योजनेकडे तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होत
आहे.
टेंभू योजनेची शेतकऱ्यांकडे अडकलेली १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी महावितरणने भरुन घ्यावी आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा. शासनाकडे अडकलेली टंचाई काळातील थकबाकी मिळणार आहे, तसे हमीपत्रही घेतले आहे. आता याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. उन्हाची तीव्रता वाढत आहे. पिके कोमेजू लागली आहेत. पाणी त्वरित मिळाले नाही, तर पिके करपतील, अशी वस्तुस्थिती टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात दिसत आहे.

स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू
टेंभू योजनेची पाणीपट्टी आकारणी, वसुली, तसेच आवर्तनाचे व्यवस्थापन आदी कामे सुरळीत व पारदर्शक व्हावीत म्हणून योजनेचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू केला आहे. याचे विभागीय कार्यालय ओगलेवाडी येथे, तर उपविभागीय कार्यालय कडेपूर येथे सुरू होत आहे. लाभक्षेत्र वाढले की पाणीपट्टी आकारणी कमी होते. शेतकऱ्यांनी आपल्या लाभक्षेत्राची माहिती प्रामाणिकपणे योजनेकडे देणे गरजेचे आहे.