शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी विचारांची धास्ती का वाटते?

By admin | Updated: February 25, 2015 00:02 IST

राजन गवस यांचा सवाल : वाळव्यात अरुण नायकवडी स्मृतिदिन कार्यक्रम

वाळवा : सध्या राज्यात काय चालले आहे व चालणार आहे हे समजू शकत नाही. कुणाच्या दारात केव्हा मारेकरी येतील हेसुध्दा सांगता येत नाही. येथील पुरोगामी विचारांची कुणाला आणि कशासाठी धास्ती वाटते?, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस यांनी केला.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावर आज (मंगळवार) अरुण नायकवडी यांचा दहावा स्मृतिदिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष जयवंत अहिर, कारखाना उपाध्यक्षा सौ. वंदना माने, नीलावती माळी, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, महेश कराडकर, डॉ. शीतल भरमगुडे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले उपस्थित होते.प्रा. गवस म्हणाले की, आज जीवनमूल्यांचा ऱ्हास झाला आहे. मात्र गरजांचा हैदोस वाढला आहे. केव्हा तरी उपयोगी पडणाऱ्या व उपद्रवी ठरणाऱ्यालाच सध्या सलाम केला जात आहे. त्यामुळे आदर्श धाकच संपला आहे. शेतकऱ्यांना जगविण्यासाठी माध्यम म्हणून वृत्तपत्रांनी आता यापुढे जबाबदारी घेऊन लेखन करावे.
वैभव नायकवडी म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनंतर कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या झाली. त्यांच्या मारेकऱ्यांना शासनाने शोधावे. त्यांचे विचार दाबण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यांनाही उघडे करा, त्यांना कठोर शासन करा. पुरोगामी विचारवंतांना देह संपला तरी त्याचे विचार मात्र संपणार नाहीत, हे जातीयवादी प्रवृतींनी लक्षात घ्यावे. यावेळी अनुभूती अरुण नायकवडी म्हणाल्या की, क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी ही शिल्पातून निर्माण झालेली माणसे होत. अरुण हे स्वत:ला कामात झोकून देणारे व्यक्तिमत्त्व होते. आज ते असते, तर ‘हुतात्मा’च्या रथाची चाके आणखी वेगाने धावली असती.
प्रारंभी अरुण नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजा माळगी, प्रा. के. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच गौरव नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, नजीर वलांडकर, हुतात्मा दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक, पोपट अहिर, संजय अहिर, अशोक माने, संजय खोत, नंदू पाटील, उपसरपंच सौ. अपर्णा साळुंखे हुतात्मा संकुलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

विचारांची लढाई विचारांनीच करावी
यावेळी राजन गवस म्हणाले की, देशाला पुरोगामीत्वाचा विचार देणाऱ्या महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्या होत आहेत, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. प्रथम दाभोलकर, आता पानसरे यांची हत्या करणारे अजूनही मोकाटच आहेत. या विचारवंतांपासून कोणत्या प्रकारची भीती कोणाला होती हेच कळेनासे झाले आहे. एखाद्याला तुम्ही देहाने संपवाल, पण त्यांनी दिलेला विचार कधीही संपत नसतो. जगण्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या तरी हाती जाणे, हे अराजकतेचे लक्षण आहे. विचारांची लढाई शस्त्रांऐवजी विचारानेच करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.