शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

मोरणा धरणाची उंची वाढणार कधी?

By admin | Updated: February 13, 2015 00:51 IST

प्रस्ताव मंजूर : शासकीय यंत्रणेमुळे काम रखडले

विकास शहा - शिराळा  तालुक्यात डोंगरी विभागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असले तरी, या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवणूक करण्यासाठी धरणांची संख्या कमी असल्याने पाणी वाहून जात आहे. शिराळा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या मध्यम मोरणा धरण प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर असून, हे काम रखडले आहे. या प्रकल्पाची उंची वाढविणे गरजेचे आहे.
मोरणा प्रकल्पामुळे तसेच मोरणा नदीमुळे नदीलगतच्या गावांतील शेती फुलू लागल्याने शेतकरी समृध्द झाला आहे. १९८५-८६ मध्ये प्रथम पाणीसाठा करण्यात आला. त्यानंतर शिराळा शहराची प्रगती खऱ्याअर्थाने सुरु झाली. याअगोदर मोरणा नदी पावसाळ्यात भरुन वाहात असे. मात्र उन्हाळ्यात पिण्यास पाणी मिळत नसे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मोरणा धरणास मंजुरी मिळाली. १0१५ मीटर लांबी व ३१ मीटर उंचीच्या या धरणात 0.७५ टी.एम.सी. पाणीसाठा होत आहे. या धरणास चार कोटी खर्च आला. शेतीच्या पाणीपट्टीतून दरवर्षी पाटबंधारे विभागास पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
१९९४ मध्ये या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. त्यावेळी आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यामध्ये १00 मीटर रुंदीचा सांडवा १५७ मीटर रुंद करण्यासाठी दीड कोटी रुपये, सांडव्यात १२ बाय ३ मीटर आकाराचे ९ वक्राकार दरवाजे, त्याद्वारे पाणी साठ्याची सुमारे दोन मीटरने उंची वाढविण्याचा प्रस्ताव आहे. या सांडवा खुदाईत नियोजित दरवाजाच्या बांधकामाच्या पायासाठी खुदाई केल्याने धरणातील मूळ पाण्याची क्षमता कमी झाली. यानंतर विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी या सांडव्यात भिंत बांधली. गेल्या पाच वर्षात वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे काम सुरु झाल्याने या योजनेचे पाणी या धरणात येत आहे. ते मांगले गावापर्यंत पोहोचले आहे. आता या धरणाची उंची वाढविल्यास या धरणातील अतिरिक्त पाणी अंत्री, शिवणी धरणातून उचलून भटवाडी, बेलदारवाडी येथील पाझर तलावात सोडण्यात येईल.
वाढती लोकसंख्या, त्याबरोबरच वाढत जाणारी बागायत शेती याचा विचार केल्यास, पाण्याची मागणी वाढतच राहणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढविणे गरजेचे आहे. अंत्रीपासून मांगले गावापर्यंत २५ कि.मी. मोरणा खोऱ्यातील २0 ते २५ गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीचे पाणी मिळून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. (वार्ताहर)

शेतकरी, नागरिकांना फायदा
सध्या १६0४ हेक्टर सिंचन क्षमता आहे. सांडव्यात दरवाजे बांधून उंची वाढविल्यास अर्धा टी.एम.सी. पाणीसाठा वाढविला आहे. १२६0 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. १ हजार १७१ द.ल.घ.फूट एकूण पाणीसाठा होऊन २८५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाटबंधारे खात्याने यापूर्वी भूसंपादन केलेले क्षेत्र बुडत नाही. त्यामुळे पाणीसाठा वाढल्यास नवीन जमीन भूसंपादन करावे लागणार नाही. धरणाची उंची वाढल्यास शेतकरी, नागरिकांचा मोठा फायदा होणार या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.