शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

ऊस आंदोलन करणारे गप्प का?

By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST

अजित पवार : कृष्णा साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

शिरटे : दरवर्षी ऊस दरासाठी आंदोलन करणारी मंडळी यावेळी गप्प का आहेत? शरद पवार कृषिमंत्री होते, म्हणून बारामतीत ठिय्या आंदोलन केले. आता कोठे करणार? असा सवाल उपस्थित करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला टार्गेट केले. याचवेळी त्यांनी, पुन्हा निवडणुका नकोत व जनतेच्या भल्यासाठीच आम्ही भाजपला पाठिंबा दिल्याचेही स्पष्ट केले.
य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याच्या ५५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ व कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘क्रांती’चे अध्यक्ष अरुण लाड, ‘कृष्णा’चे अध्यक्ष अविनाश मोहिते, राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जय हनुमान पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील साखर उद्योगात ‘कृष्णा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ज्यांनी संस्थाच काढल्या नाहीत किंवा चालवल्या नाहीत, अशांनी साखरसम्राट, शिक्षणसम्राट म्हणून हिनविण्याचे काम केले. आज साखर उद्योगासमोर अनेक समस्या आहेत. एफआरपीनुसार दर देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची मदत महत्त्वाची असून, अजूनही त्यांच्याकडून आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना गतवर्षी एफआरपीप्रमाणे दर देता यावा यासाठी ६ हजार ६00 कोटी रुपये बिनव्याजी दिले होते. यावेळीही असेच अनुदान मिळणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. परंतु गेल्या ६ महिन्यांचा विचार केला, तर निर्यातीपेक्षा आयातच जास्त झाली असल्याने, देशासाठी हे घातक आहे. सहकारातील अनेक साखर कारखाने देशोधडीला लागले आहेत. त्यातच खासगी साखर कारखान्यांनी डोके वर काढले असून त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. ‘कृष्णा’च्या अध्यक्षांसारखा शांत व संयमी अध्यक्ष कोठेही पाहिलेला नाही. त्यांच्या डोक्यात सत्ता व खुर्चीची हवा नाही. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून निवडणूक जिंकली आहे. सभासदांचा विश्वास त्यांनी संपादन केला असून तो सार्थ ठरवावा, असा सल्लाही पवार यांनी अविनाश मोहिते यांना दिला.
‘कृष्णा’चे अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, कारखाना सुरु करण्यास अवकाळी पावसामुळे विलंब झाला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोडीला प्राधान्य दिले असून याहीवर्षी गेटकेनचा ऊस आणला जाणार नाही.
प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. ‘कृष्णा’चे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. जाधव, पं. स. सदस्य सुनील पोळ, जयकर पाटील, सुभाष पाटील, जयश्री कदम, उमेश पवार, सुस्मिता जाधव, जयेश मोहिते, संचालक ब्रह्मानंद पाटील, संभाजी दमामे, नितीन खरात, सुभाष शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)

वसंतदादांची शोकांतिका
लोकहित डोळ्यासमोर ठेवून वसंतदादांनी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्याच कारखान्याला आज गाळप परवाना मिळू शकत नाही. देणी देण्यासाठी कारखान्याची जमीन विक्रीस काढावी लागत आहे, ही शोकांतिका असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पतंगरावांना टोला
घाटावरील काहीजण ‘कृष्णा’चे धुराडे बंद पडेल असे म्हणत आहेत. परंतु हे धुराडे सभासदांच्या विश्वासावर असेच चालू राहणार, असे कृषिमित्र अशोकराव थोरात म्हणाले. तर घाटावरील भविष्यकारांनी काहीही भविष्य वर्तवले तरी, ‘कृष्णा’चे काहीही होणार नाही, असा टोला दिलीपराव पाटील यांनी पतंगराव कदम यांचे नाव न घेता लगावला.