शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी पुन्हा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

सांगली : कोयना व वारणा धरणांमधून गुरुवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ ...

सांगली : कोयना व वारणा धरणांमधून गुरुवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना घरी न परतण्याचे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाने गुरुवारी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांचा पूर गेल्या तीन दिवसांपासून ओसरत आहे. अनेक ठिकाणी पाणी नदीपात्रात परतले आहे. सांगली शहरात अद्याप अनेक भागांमध्ये पुराचे पाणी कायम आहे. अशा परिस्थितीत धरणांमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयना धरणातून सध्या ४८ हजार ९३१ क्युसेक, तर वारणा धरणातून १४ हजार ९८० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपातळीत एक ते दोन फूट वाढ होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

सांगलीतील नदीपातळी पुन्हा ४२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांनी घरी परतण्याची घाई करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गेल्या तीन दिवसांत घट होऊन पाणी इशारा पातळीच्या खाली आले होते. आता काही ठिकाणी ते पुन्हा इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी ओसरले होते, अशा काही भागांत पुन्हा पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.

चौकट

वारणा ९१ टक्के, तर कोयना ८६ टक्के भरले

काेेयना धरण ८६ टक्के भरले असून त्यातील साठा ९०.१४ टीएमसी झाला आहे. वारणा धरणातील साठा ३१.३४ टीएमसी इतका असून, हे धरण ९१.२१ टीएमसी भरले आहे. त्यामुळे धरणांमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे.

चौकट

पावसाच्या तुरळक सरी

सांगली, मिरज शहर व परिसरात गुरुवारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात येत्या २ ऑगस्टपर्यंत रोज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या अंदाजामुळे नदीकाठी पुन्हा धास्ती वाढली आहे.

चौकट

सांगलीत या भागांत अद्याप पाणी

सांगली शहरात कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, जुना बुधगाव रस्त्याजवळील ओतात अद्याप पाणी आहे. सध्या सांगलीतील पाणीपातळी ३८ फुटांपर्यंत आली आहे. नदीपातळी ४२ फुटांवर गेली तर पुन्हा काही भागांत पाणी शिरण्याची शक्यता आहे.

चौकट

सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी फूट

(गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

बहे ७.६

ताकारी ३२.६

भिलवडी ३६.५

सांगली ३८.७

अंकली ४५.०७

म्हैसाळ ५६

चौकट

व्यापारी पेठांमध्ये स्वच्छता सुरूच

पूर ओसरल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी व्यापारी पेठांमध्ये स्वच्छतेचे काम सुरू होते. बहुतांश दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत. महापुराने झालेल्या नुकसानीमुळे व्यापारी पेठेत अस्वस्थता आहे.