शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांच्या वारसदारांची संघर्ष एक्स्प्रेस

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

जिल्हा बँक निवडणूक : विधानसभा, लोकसभा, कारखान्यानंतर आता बँकेत आमने-सामने--जिल्हा बँक निवडणूक

अविनाश कोळी - सांगली  --वसंतदादा घराण्यातील सत्तासंघर्षाची कहाणी जुनी आहे. विधानसभा, लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अशा अनेक निवडणुकांमध्ये एकमेकांशी लढलेले वारसदार आता याच परंपरेचा भाग म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत आमने-सामने आले आहेत. दादा घराण्यातील फुटीचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी आल्याने, या निवडणुकीची चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा प्रभाव राहिला. त्यांच्याभोवतीच कॉँग्रेस पक्षातील राजकारण फिरत राहिले. निष्ठावंतांबरोबरच बंडखोरांचा, स्वकियांच्या कुरघोड्यांचा अनुभव दादांनी व कॉँग्रेसनेही घेतला. संघर्षाची ही कहाणी स्वातंत्र्यानंतर लगेचच कॉँग्रेसच्या वाट्याला आली. वसंतदादांच्या घराण्यातील छुपा संघर्ष जुना असला तरी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत तो चव्हाट्यावर आला. त्यानंतर लोकसभा, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना असा प्रवास करीत हा संघर्ष आता जिल्हा बॅँकेपर्यंत आला आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आता मदन पाटील आणि विशाल पाटील हे दोन्ही चुलत बंधू एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. संघर्ष करूनही दादा घराण्यातील वारसदार अनेक कार्यक्रमांमध्ये पक्षीय राजकारणात, निवडणुकांत एकत्रही असतात. अशावेळी दादा घराण्यात कोणताही संघर्ष नसल्याचे वारंवार सांगण्यासही ते कमी पडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीच्या काळात मदन पाटील प्रचारात उतरले नव्हते. तेव्हाही या संघर्षाची जोरदार चर्चा सुरू होती. अल्पावधितच मदन पाटील प्रचारात उतरले आणि त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही प्रतीक पाटील यांच्या भूमिकेबद्दल मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी साशंकता व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीतही काही काळ मागील विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटले होते. शंकेच्या कुंपणातच दादांच्या वारसदारांमधील एकीची चर्चा केली जाते. प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि मदन पाटील यांच्या बंधूंमधील संघर्षाला जिल्हा बॅँकेच्या निमित्ताने तोंड फुटले आहे. मदन पाटील हे वसंतदादांच्या विचारांचेही वारसदार नाहीत, अशी टीका विशाल पाटील यांनी नुकतीच केली. विशाल पाटील यांनी एका बाजूने मदन पाटील यांच्यावर टीका सुरू केली असताना, मदन पाटील शांत आहेत. त्यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. तरीही विशाल पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. विचारांचा वारसा दोन्हीकडे असला तरी, संघर्षाची परंपराही या वारसदारांना लाभली आहे. त्यामुळेच टप्प्या-टप्प्यावर हे वारसदार आपसात लढण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. दादा घराण्यात यानिमित्ताने पडलेली फूट आता जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे. या चर्चेभोवतीच आता राजकारणही रंगले आहे. दादा घराण्यातील दोन वारसदार एकमेकांविरोधात लढत असल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशी आहे परंपरा संघर्षाची...१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसतर्फे प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळी मदन पाटील यांनी बंडखोरी केली. चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात मैदानात आले. उघडपणे मैदानात येण्याची ही कहाणी तशीच सुरू राहिली. १९९८ नंतर दादा घराण्यातील दोन कुटुंबांच्या वाटा वेगळ्या झाल्या. विष्णुअण्णांचे कुटुंब राष्ट्रवादीत, तर प्रकाशबापूंचे कुटुंब कॉँग्रेसमध्ये राहिले. त्यामुळे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाशबापू व मदन पाटील पुन्हा आमने-सामने आले. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही प्रकाशबापू व विष्णुअण्णा या दोघांनी वेगवेगळी पॅनेल उभी करून एकमेकांना आव्हान दिले होते.शंका-कुशंकाविधानसभा, लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी घराण्यातील अंतर्गत छुप्या संघर्षाचा मुद्दा चर्चेला येतोच. दोन्ही कुटुंबांमधील नेत्यांच्या प्रत्येक कृतीवरून संशयकल्लोळही निर्माण होतो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या वारसदारांमधील हालचालींना शंका-कुशंकांचे ग्रहण लागले, ते अजून कायम आहे.