शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
7
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
8
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
9
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
10
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
11
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
12
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
13
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
14
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
15
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
16
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
17
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
18
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
19
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
20
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'बाबत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:29 IST

महामार्गासाठी भूसंपादनाचे शासनाचे आदेश

सांगली : शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाचे आदेश देत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीत गुरुवारी केला.कृती समितीचे पदाधिकारी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर म्हणाले, महाराष्ट्र सरकारने घाई-गडबडीने संयुक्त मोजणीदेखील पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा केली नाही. शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध डावलत गुरुवारी वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाचे आदेश दिले आहेत. हा आदेश म्हणजे महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळस आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त मोजणीचे आदेश सरकारने दिले, पण ९९ टक्के गावांमध्ये प्रांताधिकारी यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध करत गावातून पळून लावले आहे. असे असताना देखील भूसंपादनाचा आदेश देणे म्हणजे ही महाराष्ट्राची हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. एकीकडे शेती संकटात सापडली असल्यामुळे मराठा समाजातील तरुण आरक्षण मागत आंदोलन करत आहेत. त्यांना आरक्षण तर दिलेच पाहिजे, पण त्याबरोबरच शेतीमधील संकटांवर उपाययोजना सरकारने करायला हवी. महाराष्ट्रातील गरज नसलेल्या प्रकल्पांमुळे शेती क्षेत्र ५० टक्क्यांवर आले आहे. शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करत आहेत. या भीषण शेती संकटाकडे दुर्लक्ष करत महायुती सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या २७ हजार एकर भूसंपादनाद्वारे पुन्हा शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवत आहे. याचा आम्ही शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती जाहीर निषेध करत आहोत. महायुती सरकारने कितीही कागदी आदेश दिले, तरी शेतकरी कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन होऊ देणार नाहीत. शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत. या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारचे उद्योगपतींना शेतजमिनी घशात घालायचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता शेतकरी व नागरिक वाढवतील.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास सरकार जबाबदारगावागावांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास, याला संपूर्ण महायुती सरकार जबाबदार राहील. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर वगळले असल्याची धूळफेक आदेश काढणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा कोल्हापूरमधून लोकप्रतिनिधींची चर्चा करून पर्यायी रस्ता काढा, असा आदेश दिला आहे. या गोष्टीचाही निषेध व्यक्त करतो. कोल्हापुरातील कोणत्याही जमिनीवरून रस्ता गेला तरी त्याला विरोध राहील. हा गरज नसलेला रस्ता म्हणजे लोकांच्या पैशाचा अपव्यय आहे, अशी टीका अखिल भारती किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली.