शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

'शक्तिपीठ'बाबत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:29 IST

महामार्गासाठी भूसंपादनाचे शासनाचे आदेश

सांगली : शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाचे आदेश देत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीत गुरुवारी केला.कृती समितीचे पदाधिकारी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर म्हणाले, महाराष्ट्र सरकारने घाई-गडबडीने संयुक्त मोजणीदेखील पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा केली नाही. शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध डावलत गुरुवारी वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाचे आदेश दिले आहेत. हा आदेश म्हणजे महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळस आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त मोजणीचे आदेश सरकारने दिले, पण ९९ टक्के गावांमध्ये प्रांताधिकारी यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध करत गावातून पळून लावले आहे. असे असताना देखील भूसंपादनाचा आदेश देणे म्हणजे ही महाराष्ट्राची हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. एकीकडे शेती संकटात सापडली असल्यामुळे मराठा समाजातील तरुण आरक्षण मागत आंदोलन करत आहेत. त्यांना आरक्षण तर दिलेच पाहिजे, पण त्याबरोबरच शेतीमधील संकटांवर उपाययोजना सरकारने करायला हवी. महाराष्ट्रातील गरज नसलेल्या प्रकल्पांमुळे शेती क्षेत्र ५० टक्क्यांवर आले आहे. शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करत आहेत. या भीषण शेती संकटाकडे दुर्लक्ष करत महायुती सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या २७ हजार एकर भूसंपादनाद्वारे पुन्हा शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवत आहे. याचा आम्ही शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती जाहीर निषेध करत आहोत. महायुती सरकारने कितीही कागदी आदेश दिले, तरी शेतकरी कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन होऊ देणार नाहीत. शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत. या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारचे उद्योगपतींना शेतजमिनी घशात घालायचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता शेतकरी व नागरिक वाढवतील.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास सरकार जबाबदारगावागावांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास, याला संपूर्ण महायुती सरकार जबाबदार राहील. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर वगळले असल्याची धूळफेक आदेश काढणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा कोल्हापूरमधून लोकप्रतिनिधींची चर्चा करून पर्यायी रस्ता काढा, असा आदेश दिला आहे. या गोष्टीचाही निषेध व्यक्त करतो. कोल्हापुरातील कोणत्याही जमिनीवरून रस्ता गेला तरी त्याला विरोध राहील. हा गरज नसलेला रस्ता म्हणजे लोकांच्या पैशाचा अपव्यय आहे, अशी टीका अखिल भारती किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली.