शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

हक्काचे पाणी हिसकावून घेऊ

By admin | Updated: January 3, 2017 23:32 IST

राजेंद्रअण्णा देशमुख : श्रमिक मुक्ती दलाचा सांगलीत मोर्चा

सांगली : उरमोडी धरणातील वापरात येऊ न शकणारे पाणी तातडीने राजेवाडी तलाव आणि माण नदीवरील बंधाऱ्यात सोडावे, या मागणीसाठी आतापर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. आता हक्काचे पाणी हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मंगळवारी मोर्चावेळी दिला. श्रमिक मुक्ती दलाच्याच्यावतीने डॉ. भारत पाटणकर व देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी देशमुख बोलत होते. आमराईपासून मोर्चास प्रारंभ झाला. स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. देशमुख म्हणाले की, उरमोडी धरणातील पाणी प्रतिवर्षी वाया जाते. ते उपयोगात आणण्याची चांगली वितरण व्यवस्थाच उपलब्ध नाही. वाया जाणारे हे पाणी राजेवाडी तलाव व माण नदीवरील बंधाऱ्यात सोडणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्या पाण्याचा उपयोग दुष्काळ निवारणास होईल. वाया जाणाऱ्या पाण्यातून नुकसान सोसण्याऐवजी ते दुष्काळी भागास दिल्यास पाणीपट्टीद्वारे शासनाला महसूल मिळू शकतो. पाटणकर म्हणाले की, टेंभू योजनेतून वगळलेली गावे समन्यायी पाणी वाटपाच्या आमच्या मागणीअंतर्गत मुख्य योजनेत समाविष्ट केली आहेत. त्या गावांना पाणी मिळणार असले तरी, त्यासाठीची यंत्रणा उभारण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत पूर्व व उत्तर भागातील गावांना पाणी मिळणार नाही. या गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही केवळ मुख्य योजनेची वितरण व्यवस्था उभी राहण्याच्या कालावधित उरमोडीचे पाणी मागत आहोत. दरवर्षी दुष्काळी भागातील रोहयोची कामे, चारा छावण्या यावर सरकारला वीस ते पंचवीस कोटी रुपये खर्चावे लागतात. दुसरीकडे १२ कोटी रुपयांमध्ये उरमोडीचे पाणी आटपाडी तालुक्यातील पूर्व-उत्तरेतील गावांना मिळू शकते. यामध्ये शेतकऱ्यांचा आणि शासनाचाही फायदा आहे. आम्ही वाया जाणारे पाणी मागत असल्याने व दुष्काळ निवारणाचा खर्च कमी करण्यासाठीचा उपाय देत असल्याने, या मागण्या मान्य करण्यास शासनाला कशाची अडचण आहे?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी शैलेश ऐवळे, विजयसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन देशमुख, बळवंत मोरे, श्रीरंग शिंदे आदींसह तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)चटणी-भाकरी आंदोलन राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, मागणीसाठी लवकरच जिल्हधिकारी कार्यालय आवारात चटणी-भाकरी आंदोलन करण्यात येईल. आजवर आम्ही एकटेच आंदोलनात येत होतो. पुढील आंदोलनात पत्नीसोबत सहभागी होऊ.आता बेमुदत आंदोलनपाटणकर म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी उरमोडीच्या पाण्यासाठी लागणारे १२ कोटी रुपये द्यावेत, अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर या मागणीसाठी आम्ही बेमुदत आंदोलन करू.जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासनआंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. आचारसंहितेपूर्वी उरमोडीतील पाणी मिळण्यासाठी १२ कोटी उपलब्ध व्हावेत. त्यासाठी तातडीने महसूलमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांसोबत बैठक आयोजित करावी, अशी मागणी पाटणकर यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सर्व ते प्रयत्न करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. खासदार संजयकाका पाटील यांनीही पाटणकर यांची भेट घेऊन मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.