शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

हक्काचे पाणी हिसकावून घेऊ

By admin | Updated: January 3, 2017 23:32 IST

राजेंद्रअण्णा देशमुख : श्रमिक मुक्ती दलाचा सांगलीत मोर्चा

सांगली : उरमोडी धरणातील वापरात येऊ न शकणारे पाणी तातडीने राजेवाडी तलाव आणि माण नदीवरील बंधाऱ्यात सोडावे, या मागणीसाठी आतापर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. आता हक्काचे पाणी हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मंगळवारी मोर्चावेळी दिला. श्रमिक मुक्ती दलाच्याच्यावतीने डॉ. भारत पाटणकर व देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी देशमुख बोलत होते. आमराईपासून मोर्चास प्रारंभ झाला. स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. देशमुख म्हणाले की, उरमोडी धरणातील पाणी प्रतिवर्षी वाया जाते. ते उपयोगात आणण्याची चांगली वितरण व्यवस्थाच उपलब्ध नाही. वाया जाणारे हे पाणी राजेवाडी तलाव व माण नदीवरील बंधाऱ्यात सोडणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्या पाण्याचा उपयोग दुष्काळ निवारणास होईल. वाया जाणाऱ्या पाण्यातून नुकसान सोसण्याऐवजी ते दुष्काळी भागास दिल्यास पाणीपट्टीद्वारे शासनाला महसूल मिळू शकतो. पाटणकर म्हणाले की, टेंभू योजनेतून वगळलेली गावे समन्यायी पाणी वाटपाच्या आमच्या मागणीअंतर्गत मुख्य योजनेत समाविष्ट केली आहेत. त्या गावांना पाणी मिळणार असले तरी, त्यासाठीची यंत्रणा उभारण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत पूर्व व उत्तर भागातील गावांना पाणी मिळणार नाही. या गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही केवळ मुख्य योजनेची वितरण व्यवस्था उभी राहण्याच्या कालावधित उरमोडीचे पाणी मागत आहोत. दरवर्षी दुष्काळी भागातील रोहयोची कामे, चारा छावण्या यावर सरकारला वीस ते पंचवीस कोटी रुपये खर्चावे लागतात. दुसरीकडे १२ कोटी रुपयांमध्ये उरमोडीचे पाणी आटपाडी तालुक्यातील पूर्व-उत्तरेतील गावांना मिळू शकते. यामध्ये शेतकऱ्यांचा आणि शासनाचाही फायदा आहे. आम्ही वाया जाणारे पाणी मागत असल्याने व दुष्काळ निवारणाचा खर्च कमी करण्यासाठीचा उपाय देत असल्याने, या मागण्या मान्य करण्यास शासनाला कशाची अडचण आहे?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी शैलेश ऐवळे, विजयसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन देशमुख, बळवंत मोरे, श्रीरंग शिंदे आदींसह तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)चटणी-भाकरी आंदोलन राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, मागणीसाठी लवकरच जिल्हधिकारी कार्यालय आवारात चटणी-भाकरी आंदोलन करण्यात येईल. आजवर आम्ही एकटेच आंदोलनात येत होतो. पुढील आंदोलनात पत्नीसोबत सहभागी होऊ.आता बेमुदत आंदोलनपाटणकर म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी उरमोडीच्या पाण्यासाठी लागणारे १२ कोटी रुपये द्यावेत, अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर या मागणीसाठी आम्ही बेमुदत आंदोलन करू.जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासनआंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. आचारसंहितेपूर्वी उरमोडीतील पाणी मिळण्यासाठी १२ कोटी उपलब्ध व्हावेत. त्यासाठी तातडीने महसूलमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांसोबत बैठक आयोजित करावी, अशी मागणी पाटणकर यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सर्व ते प्रयत्न करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. खासदार संजयकाका पाटील यांनीही पाटणकर यांची भेट घेऊन मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.