शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा दर चार दिवसात आठशेने उतरला

By admin | Updated: October 16, 2014 22:49 IST

व्यापाऱ्यांविरोधात तक्रारी : बुरशीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; संघटनांनी आवाज उठविण्याची गरज

सुरेंद्र शिराळकर -आष्टा -वाळवा तालुक्यातील आष्टा, बागणी, चिकुर्डेसह करंजवडे, देवर्डे, ठाणापुडे आदी परिसरात सोयाबीन काढणीला चांगलाच वेग आला आहे. मात्र मॉईश्चरच्या नावाखाली शेतकऱ्यांची दरामध्ये फसवणूक केली जात आहे. सोयाबीनला चार दिवसापूर्वी प्रति क्विंटल सोयाबीनला तीन हजार ८०० रूपये दर होता. लगेच यामध्ये आठशे रूपयांनी दर कमी होऊन सध्या प्रति क्विंटल तीन हजार रूपये झाला आहे. उसाच्या दराचा गोंधळ लक्षात घेऊन शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला आहे. हे पीक अवघ्या ९२ ते ९५ दिवसांचे असल्याने अल्प कालावधित चांगली कमाई होते. त्यातच हे पीक आंतरपीक म्हणून घेता येत असल्याने आष्टा, बागणी, दुधगाव, वाळवा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या भोंड्यावरती सोयाबीनची लागवड केलेली आहे. काही दिवसांच्या अंतरावर ‘दिवाळी’ हा सण आल्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळावा, अशा अपेक्षा शेतकरी वर्गाच्या आहेत. शेतकऱ्यांच्या या अपेक्षांवर व मागणीवर व्यापारी वर्गाने कुऱ्हाड घातली आहे. व्यापाऱ्यांच्या या खेळीमुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत. सोयाबीन सौद्याच्यावेळी दर तीन हजार ८00 रुपये निघाला. हा दर फक्त सुरुवातीच्या पूजन झालेल्या ५ पोत्यांसाठीच होता. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात हा दर तीन हजार ५00 रुपयांवर आला. लगेच दोनच दिवसात हा दर तीन हजार ३00 रुपयांवर आला. आता तर तो दर तीन हजार रुपयांवर येऊन स्थिरावला आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादक मालाची किंमत वाढविण्यासाठी अनेक दिवस नव्हे, तर अनेक हंगाम घालवले जातात. त्यासाठी अनेक समित्या नेमून त्यांच्यावर अभ्यास केला जातो. या समित्यांमधील अभ्यासक मंडळींचा शेतीचा, शेतातील मातीचा व सोयाबीनचा कधीही संपर्क आलेला नसतो. नोंदवह्यांतील कागदावर आकडेमोड करून ही समिती सोयाबीन किंवा इतर शेतीमालाचा दर अंशत: वाढविते. या प्रक्रियेत अनेक हंगामांचा कालावधी लोटलेला असतो.परंतु याच्या उलट परिस्थिती शेतीमालाचे दर कमी करण्याबाबत दिसून येत आहे. शेतीमालाचा दर कमी करण्यासाठी समिती लागत नाही. कोणताही शासनआदेश लागत नाही किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीची शिफारस लागत नाही. फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यायचा व दर अंतिम जाहीर करावयाचा. इतकी दयनीय व जुलमी अवस्था शेतकऱ्यांबाबत होत आहे. या देशात शेती करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरीही शेतकऱ्यांची लुबाडणूक प्रत्येक घटकाकडून होत आहे. औषध दुकानदारापासून ते शेतीमाल खरेदी करणाऱ्यापर्यंत सर्वच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. बाजार समित्या नावापुरत्याच आहेत.यंत्रामध्ये गोलमालव्यापारी मॉईश्चर यंत्रामध्ये गोलमाल करतात व सोयाबीनचा दर पाडतात. हे यंत्र अधिकृत मान्यता असणारे नाही. कुणीही आणि कसेही बनविलेले ते यंत्र आहे. सेकंदात बदल करता येतो. सेकंदात शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असतानाही याविरोधात आवाज उठविला जात नाही.व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असताना शासन, लोकप्रतिनिधी गप्प असल्याबद्दल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया.सोयाबीन सौद्याच्यावेळी दर तीन हजार ८00 रुपये निघाला. हा दर फक्त सुरुवातीच्या पूजन झालेल्या ५ पोत्यांसाठीच होता. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात हा दर तीन हजार ५00 रुपयांवर आला. लगेच दोनच दिवसात हा दर तीन हजार ३00 रुपयांवर आला. आता तर तो दर तीन हजार रुपयांवर स्थिरावला आहे. सोयाबीनचा दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्च तरी पडेल का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे