शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

बापरे! कमळापूर परिसरात बिबट्याचा बछड्यांसह वावर, सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:27 IST

कमळापूर (ता.खानापूर) येथील आळसंद रस्त्यालगतच्या परिसरातील शेतात मादी जातीच्या बिबट्याचा बछड्यांसह वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड घबराट पसरली आहे.

विटा (जि. सांगली), दिलीप मोहिते  : कमळापूर (ता.खानापूर) येथील आळसंद रस्त्यालगतच्या परिसरातील शेतात मादी जातीच्या बिबट्याचा बछड्यांसह वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड घबराट पसरली आहे. बिबट्याच्या वावर असल्याच्या चर्चेवर आता वनविभागाने शिक्कामोर्तब केले असून ट्रॅप कॅमेऱ्यांसह वन विभागाचे कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकºयांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात न जाता सावधनता बाळगावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे यांनी केले आहे.

कमळापूर येथील दशरथ साळुंखे, सुदाम जाधव यांच्यासह अन्य शेतकºयांच्या आळसंद रस्त्याच्या आतील उत्तर बाजूस असलेल्या ऊसाच्या शेतात बिबट्या असल्याचे गेल्या चार दिवसापूर्वी शेतकरी व  ऊसतोड मजुरांनी पाहिले होते. त्याची माहिती सरपंच जयकर साळुंखे व शंकर साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने वनक्षेत्रपाल कांबळे यांना याबाबत कळविले.त्यानंतर वनक्षेत्रपाल कांबळे यांच्यासह वनपाल महेश आंबी आणि वन कर्मचारी मंगळवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनाही एका लिंबाच्या झाडावर बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ट्रॅप कॅमेºयांव्दारे ठेहळणी सुरू केली. गेल्या चार दिवसापासून बिबट्या तेथील ऊसाच्या शेतात व नंतर लिंबाच्या झाडावर येत असल्याने तो मादी जातीचा असल्याचे व त्याची बछडे ऊसाच्या शेतात असावीत, असा संशय वन अधिकाऱ्यांना आला आहे.

त्यामुळे तेथील परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून मादी जातीच्या बिबट्यासह तिच्या बछड्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मंगळवारपासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात तळ ठोकून आहेत. दरम्यान, त्या परिसरात शेतकरी व ऊस तोड मजुरांनी जाऊ नये, असे आवाहन वनक्षेत्रपाल कांबळे यांनी केले असून विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पोलीस पथक ही परिसरात गस्त घालत आहे.

कमळापूर परिसरात मादी जातीच्या बिबट्यासह तिची बछडेही असल्याची माहिती वनक्षेत्रपाल कांबळे यांनी सांगलीच्या वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना दिली असून त्याबाबत कार्यवाही करण्याची तयारी सुरू झाली आहे. या बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतकऱ्यांसह नागरीकांतही प्रचंड भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली