शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चार पुलांमुळे सांगली सापडतेय महापुराच्या चक्रव्यूहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही बाजूंनी महापुराच्या जबड्यात ढकलले जात आहे. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात असल्याची तज्ज्ञांची भूमिका आहे.

कृष्णेवर सध्या आयर्विन, बायपास हे दोन पूल अस्तित्वात आहेत. हरिपूर - कोथळी पूल पूर्णत्वाकडे आहे, तर सांगलीवाडी ते पांजरपोळ पुलाची चर्चा सुरु आहे. या पुलांच्या नियोजनात जलशास्त्रीय विचार केला जात नसल्याने सांगली महापुरात ढकलली जात आहे. हरिपूर - कोथळी पुलाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा प्रकर्षाने पटलावर आली आहे. यंदा ४५ फुटांच्या इशारा पातळीलाच पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे पावसाळ्यात उपयोग होणार नाही हे स्पष्ट आहे. दोन्ही बाजूच्या भरावामुळेही पाणी अडून राहणार आहे. भरावाऐवजी पिलर टाकून बॉक्स तयार करता येईल, त्यावरुन जोडरस्ते तयार करता येतील असाही प्रस्ताव आहे. हरिपूर ग्रामस्थांनी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला होता, पण दोन ते तीन कोटींचा खर्च वाढण्याने प्रस्ताव मागे पडला.

रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव देखील महापुराची तीव्रता वाढविणारा आहे. महामार्गासाठी सुमारे १५ फूट उंच भराव टाकला आहे. कोल्हापूर रस्त्यावर पसरणारे कृष्णेचे पाणी अंकलीकडून नदीत परतण्याचा मार्ग भरावामुळे अडवला गेला आहे. भरावाऐवजी अंकली फाट्यापासून मिरजेकडे सुमारे १० किलोमीटरपर्यंत उड्डाणपुलाची मागणी इनाम धामणी ग्रामस्थांनी केली आहे, पण रस्त्याचे काम पुढे गेले असल्याने हा पर्याय मागे पडला आहे.

या स्थितीत आता सांगलीवाडीतून शहराला जोडणाऱ्या पुलाची चर्चा सुरू आहे. तो प्रत्यक्षात आल्यास महापुराचे पाणी पुढे न जाता थेट सांगलीतच घुसण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चौकट

भरावाऐवजी बॉक्सचा पर्याय

पुलांच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यांवर भराव टाकण्याऐवजी बॉक्सचा पर्याय तज्ज्ञांनी सुचविला आहे. सिमेंटच्या पिलरवर स्लॅब टाकून जोडरस्ते तयार करता येतील, जेणेकरुन त्याखालून पुराचे पाणी वाहून जाईल.

कोट

हरिपूर - कोथळी पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव न टाकता बॉक्स बनविल्यास महापुराचे पाणी अडून राहणार नाही. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात आहे.

- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

- पुलामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात, फुगवटा तयार होतो हे नाकारुन चालणार नाही. जोड रस्त्यांची उंची कमी ठेवल्याने महापुरात पूल निरुपयोगी ठरतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल उभारताना पाटबंधारेशी समन्वय राखला पाहिजे.

- विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता.