शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:25 IST

सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाही, ते सांगली काय सांभाळणार, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ...

सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाही, ते सांगली काय सांभाळणार, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी भाजप व मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ चव्हाण यांची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयश्रीताई पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करू शकले नाहीत. सांगलीत प्रचारालाही येऊ शकले नाहीत. मराठा आरक्षणावरून राज्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. धनगर, मुस्लिम समाजातही नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांना तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. ते काय सांगलीचा सांभाळ करणार? सांगलीने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. वसंतदादा, राजारामबापूंपासून ते पतंगराव कदम यांच्यापर्यंत अनेकांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यामुळे या शहराला बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही. चार वर्षात भाजप सरकारने महापालिकेला कसलीही मदत केली नाही. तरीही महापालिकेने २०० कोटीची कामे केली. आता कुणीही येतो व शिव्याशाप देतो, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. येत्या पाच वर्षात काँग्रेस आघाडीच सांगलीत सुवर्णकाळ आणू शकते. सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ दिल्यास या शहराच्या विकासाची हमी मी घेतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.जीएसटीने व्यापार उद्ध्वस्त झाला आहे. रोजगार कमी झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चार वर्षात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारला जाग येत नाही. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मग आत्महत्या का थांबलेल्या नाहीत? आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, आम्ही काही तरी करतो आहे, हे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.जयंत पाटील म्हणाले की, चार वर्षांत भाजपचे नेते जे बोलले त्यातील काहीच काम त्यांनी केले नाही. केवळ जाती-धर्मात तेढ वाढविण्याचे काम केले आहे. सांगण्यासारखे काहीच नसल्याने जातीय तणाव वाढविला जात आहे. पुन्हा अच्छे दिन आणायचे असतील, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच पर्याय असल्याचे सांगितले.भाजपकडून जनतेचा विश्वासघातदेशात महागाई वाढली आहे, व्यापार, उद्योगधंदे बंद पडत आहेत, शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागला, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या नावाखाली चार वर्षे खेळवत ठेवले. भाजप सरकारच्या काळात एकही घटक समाधानी नाही. जनतेचा विश्वासघात झाला आहे. त्यामुळेच देशात वातावरण बदलत असून, परिवर्तनाच्या या लढाईत सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन आ. विश्वजित कदम यांनी केले.

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस