शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:25 IST

सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाही, ते सांगली काय सांभाळणार, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ...

सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाही, ते सांगली काय सांभाळणार, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी भाजप व मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ चव्हाण यांची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयश्रीताई पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करू शकले नाहीत. सांगलीत प्रचारालाही येऊ शकले नाहीत. मराठा आरक्षणावरून राज्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. धनगर, मुस्लिम समाजातही नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांना तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. ते काय सांगलीचा सांभाळ करणार? सांगलीने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. वसंतदादा, राजारामबापूंपासून ते पतंगराव कदम यांच्यापर्यंत अनेकांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यामुळे या शहराला बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही. चार वर्षात भाजप सरकारने महापालिकेला कसलीही मदत केली नाही. तरीही महापालिकेने २०० कोटीची कामे केली. आता कुणीही येतो व शिव्याशाप देतो, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. येत्या पाच वर्षात काँग्रेस आघाडीच सांगलीत सुवर्णकाळ आणू शकते. सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ दिल्यास या शहराच्या विकासाची हमी मी घेतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.जीएसटीने व्यापार उद्ध्वस्त झाला आहे. रोजगार कमी झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चार वर्षात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारला जाग येत नाही. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मग आत्महत्या का थांबलेल्या नाहीत? आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, आम्ही काही तरी करतो आहे, हे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.जयंत पाटील म्हणाले की, चार वर्षांत भाजपचे नेते जे बोलले त्यातील काहीच काम त्यांनी केले नाही. केवळ जाती-धर्मात तेढ वाढविण्याचे काम केले आहे. सांगण्यासारखे काहीच नसल्याने जातीय तणाव वाढविला जात आहे. पुन्हा अच्छे दिन आणायचे असतील, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच पर्याय असल्याचे सांगितले.भाजपकडून जनतेचा विश्वासघातदेशात महागाई वाढली आहे, व्यापार, उद्योगधंदे बंद पडत आहेत, शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागला, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या नावाखाली चार वर्षे खेळवत ठेवले. भाजप सरकारच्या काळात एकही घटक समाधानी नाही. जनतेचा विश्वासघात झाला आहे. त्यामुळेच देशात वातावरण बदलत असून, परिवर्तनाच्या या लढाईत सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन आ. विश्वजित कदम यांनी केले.

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस