शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

दुष्काळबाधित शेतकऱ्यांना मदतीचा 34 कोटी निधीचा पहिला हप्ता प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:27 IST

गत वर्षीच्या खरीप हंगामात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासन संवेदनशील आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, मदतीचा पहिला हप्त्यांतर्गत 34 कोटी 40 लाख 64 हजार इतका निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे दुष्काळबाधित शेतकऱ्यांना मदतीचा 34 कोटी निधीचा पहिला हप्ता प्राप्ततासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी व खानापूर-विटा येथील शेतकऱ्यांना वितरीत

सांगली : गत वर्षीच्या खरीप हंगामात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासन संवेदनशील आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, मदतीचा पहिला हप्त्यांतर्गत 34 कोटी 40 लाख 64 हजार इतका निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.

हा निधी तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी व खानापूर-विटा येथील तहसिलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे उपलब्ध करून दिला आहे. त्यावर संबंधित तहसीलदारांनी त्वरित कार्यवाही करायची आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, खरीप हंगाम 2018 मध्ये शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2018 अन्वये सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी व खानापूर-विटा या 5 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. तेथील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वाटप करण्याचा निर्णय दिनांक 25 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार सांगली जिल्ह्यासाठी 68 कोटी 81 लाख 28 हजार इतका निधी दोन हप्त्यामध्ये वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी प्रथम हप्ता 34 कोटी 40 लाख 64 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे.तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेला पहिला हप्ता  जत (54 गावे) -24 कोटी 64 लाख 49 हजार 15 रूपये (12 कोटी 32 लाख 24 हजार 508 रूपये), कवठेमहांकाळ (60 गावे) - 8 कोटी 49 हजार 163 रूपये (4 कोटी 24 हजार 582 रूपये), खानापूर (68 गावे) - 14 कोटी 30 लाख 26 हजार 469 रूपये (7 कोटी 15 लाख 13 हजार 235 रूपये), आटपाडी (26 गावे) - 3 कोटी 86 लाख 78 हजार 270 रूपये (1 कोटी 93 लाख 39 हजार 135 रूपये), तासगाव (69) गावे - 17 कोटी 99 लाख 25 हजार 83 रूपये (8 कोटी 99 लाख 62 हजार 540 रूपये).वितरीत करण्यात येणारी रक्कम ही बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामधून कोणत्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही. तालुक्यांना प्रथम हप्त्याच्या रकमेचे वाटप झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसे केल्याचे प्रमाणपत्र व किमान 80 टक्के निधीचा विनियोग केल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील हप्त्याची मागणी तात्काळ शासनाकडे करण्यात येणार आहे. जेणेकरून दिनांक 31 मार्च पूर्वी दुसऱ्या हप्त्याची रक्कम संबंधित जिल्ह्यांना करता येईल व सदर रक्कम 31 मार्च पूर्वी खर्ची पडेल.जिल्हाधिकारी काळम म्हणाले, आर्थिक मदतीबरोबरच दुष्काळ घोषित केलेल्या गावांमध्ये 8 विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्याचीही काटेकोर अंमलबजावणी संबंधितांनी करावयाची आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कास माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा 8 प्रकारच्या सवलती लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीSangliसांगली