शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

आळसंद तलावाच्या पाहणीचा केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

विटा : माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद ...

विटा : माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी पाटबंधारे विभागाला तातडीने आदेश देऊन तलावात पाणी सोडण्याची सूचना केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर काही लोकांनी उगाचच आळसंद तलावाची पाहणी केल्याचा केवळ फार्स केला असल्याची टीका माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचे नाव न घेता केली.

विटा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार-पाच दिवसानंतर एकदा नागरिकांना पाणी मिळत आहे. त्यामुळे मंगळवारी आमदार अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्याशी चर्चा करून आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडण्याची सूचना केली होती.

या पार्श्वभूमीवर वैभव पाटील म्हणाले, घोगाव व आळसंद जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, पाईपची गळती व ताकारी योजनेचे आवर्तन लांबल्याने आळसंद तलाव कोरडा पडल्यामुळे विटा शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. परंतु, या सर्व अडचणींवर मात करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे.

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विजेची अडचण सोडवून घेतली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जलसिंचन विभागाला आदेश देत आळसंद तलाव भरून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे येत्या दोन दिवसात ताकारीचे पाणी आळसंद तलावात येणारच होते.

परंंतु, काही राजकीय मंडळी आळसंद तलावाची पाहणी केल्याचा फार्स करत आहेत. हे नेहमीचेच आहे. परंतु, नागरिकांनी या प्रकाराला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वैभव पाटील म्हणाले.