शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

आळसंद तलावाच्या पाहणीचा केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

विटा : माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद ...

विटा : माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी पाटबंधारे विभागाला तातडीने आदेश देऊन तलावात पाणी सोडण्याची सूचना केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर काही लोकांनी उगाचच आळसंद तलावाची पाहणी केल्याचा केवळ फार्स केला असल्याची टीका माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचे नाव न घेता केली.

विटा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार-पाच दिवसानंतर एकदा नागरिकांना पाणी मिळत आहे. त्यामुळे मंगळवारी आमदार अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्याशी चर्चा करून आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडण्याची सूचना केली होती.

या पार्श्वभूमीवर वैभव पाटील म्हणाले, घोगाव व आळसंद जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, पाईपची गळती व ताकारी योजनेचे आवर्तन लांबल्याने आळसंद तलाव कोरडा पडल्यामुळे विटा शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. परंतु, या सर्व अडचणींवर मात करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे.

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विजेची अडचण सोडवून घेतली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जलसिंचन विभागाला आदेश देत आळसंद तलाव भरून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे येत्या दोन दिवसात ताकारीचे पाणी आळसंद तलावात येणारच होते.

परंंतु, काही राजकीय मंडळी आळसंद तलावाची पाहणी केल्याचा फार्स करत आहेत. हे नेहमीचेच आहे. परंतु, नागरिकांनी या प्रकाराला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वैभव पाटील म्हणाले.