शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक!, सांगली जिल्ह्यात दर पाच दिवसाला एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:15 IST

गतवर्षीच्या तुलनेत खून वाढले

सांगली : जिल्ह्यात दर पाच दिवसाला एक खून होत असल्याचे भयानक चित्र दिसून येते. सहा महिन्यांत तब्बल ३९ खून झाले आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कारणातून ३० खून झाले आहेत. इतर ९ खून गुन्हेगारीच्या वर्चस्वातून झाल्याचे दिसून येते. पोलिसांनी या सर्व खुनांचा छडा लावला असला तरी खुनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. कुपवाड, इस्लामपूर परिसरात खुनाचे प्रकार वाढले आहेत.जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत इतर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. परंतु दुसरीकडे खुनाचे प्रमाण मात्र वाढल्याचे चित्र चिंताजनक म्हणावे लागेल. गुन्हेगारी वर्चस्व, दोन टोळ्यांमधील वाद, खुनाचा बदला यातून खून वाढले नाहीत. परंतु वैयक्तिक कारणातून होणारे खून वाढले आहेत. गुन्हेगारी वर्चस्वातून खून होण्याचे प्रमाण कमी असले तरी एकंदरीत पाच दिवसाला एक खून होतोय म्हटल्यावर हे प्रमाण चिंताजनकच आहे.

गुन्हेगारी टोळ्यांना लगाम घालून संभाव्य गुन्ह्यांना आळा घालता येतो. परंतु वैयक्तिक कारणातून होणारे खून टाळणे पोलिसांच्या हातात राहिले नाही. तरीही जमिनीचा वाद, आर्थिक वाद, कौटुंबिक वाद यातून होणारे खून टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी पोलिस, जिल्हा प्रशासन यांच्यावर राहते.

जमिनीच्या वादातून किंवा गावपातळीवर इतर कारणातून होणारे वाद स्थानिक पातळीवर वेळीच मिटवले गेले तर संभाव्य गंभीर गुन्हे टाळता येतात. त्यासाठीच पोलिस पाटील यांची मदत घेऊन तंटामुक्त समित्यांसमोर गावातील वाद मिटवण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील किरकोळ तंटा, वादातून गंभीर गुन्हे घडू नयेत, दिवाणी खटल्यातून फौजदारी गुन्हा घडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.किरकोळ आणि क्षुल्लक कारणातून खून होत असल्यामुळे ते रोखण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. अल्पवयीन मुलांकडून होणारे खून हा समाजाच्या चिंतेचा विषय आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कळत, नकळत गुन्हेगारीकडे वळणारी पावले वेळीच थांबवली पाहिजेत.

कोयत्याचा सर्रास वापरशेती कामासाठी होणारा कोयत्याचा वापर अलीकडे खून करण्यासाठी होऊ लागला आहे. कोयता विक्रीवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे. त्यामुळे सहजपणे कोयता मिळतो. पोलिसांकडून आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल केले जात असूनही कोयत्याचा वापर थांबलेला नाही. जवळपास ८० ते ९० टक्के खुनाच्या गुन्ह्यात कोयता वापरला जातो.

खुनाची वेगवेगळी कारणेकौटुंबिक वाद, चारित्र्यावर संशय, अनैतिक संबंध, आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून खुनाच्या घटना घडत आहेत. ३९ पैकी ३० खून वैयक्तिक कारणातून झाले आहेत. इतर खून पूर्ववैमनस्य, खुनाचा बदला, क्षणिक वाद, दारूच्या नशेतील वाद यातून झाले आहेत.

अल्पवयीन गुन्हेगारी धोकादायकजिल्ह्यात झालेल्या अनेक खुनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला आहे. क्षणिक राग, सहनशक्ती नसणे, संयमाचा अभाव, विचार करण्याची क्षमता गमावणे आणि वाईट संगत यामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारी कृत्य करतात असे दिसून येते. काही गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठीही वापर करतात.

जिल्ह्यात इतर गंभीर गुन्ह्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटले आहे. परंतु खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कारणातून खून होण्याचे प्रमाण अधिक आहे. गाव पातळीवरील वाद, तंटे मिटवण्यासाठी पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे. तंटामुक्त समित्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. -संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली.