शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

मुंबई - पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज अडीचशेपेक्षा अधिक कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज अडीचशेपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबई - पुण्यातून दररोज दीड ते दोन हजार नागरिक जिल्ह्यात येतात. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्हा व महापालिका प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तरीही रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. आठवड्यापूर्वी १०० ते १५० च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता दररोज अडीचशे पार गेली आहे. त्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे या शहरातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्याही सध्या वाढली आहे. या नागरिकांतून कोरोनाचा पसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या प्रवासी नागिरकांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. एकूणच रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्याची चिंता मात्र वाढू लागली आहे.

चौकट

एसटी बसस्थानक

सांगली येथील मु्ख्य एसटी बसस्थानकातून मुंबई, पुणे या शहरासाठी दिवसभरात २० हून अधिक बसेस धावतात. कोरोनामुळे जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. पण, मुंबई, पुण्याहून सांगली जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या दररोज एक हजारहून अधिक प्रवासी जिल्ह्यात येत आहेत.

चौकट

रेल्वे स्थानक

सांगली - मिरज रेल्वे स्थानकातून दररोज ११ रेल्वे गाड्या धावतात. त्यातील मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी, कोयना, हुबळी दादर एक्स्प्रेस आहेत. रेल्वेतून दररोज ५००हून अधिक प्रवासी जिल्ह्यात येत आहेत. तर मुंबई - पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र घटली आहे. उत्तरेकडील गाड्या मात्र वेटींगवर आहेत.

चौकट

ट्रॅव्हल्स

कोरोनामुळे खासगी बसने प्रवासी करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. पण, मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी बसने जिल्ह्यात परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. खासगी बसेसमधून दररोज २०० हून अधिकजण जिल्ह्यात येत आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे.

चौकट

बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही

१. मुंबई, पुण्यासोबत राज्यातील कोणत्याही शहरातून सांगलीत येणाऱ्या प्रवाशांची एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात येत नाही. त्याबाबत प्रशासनाकडून नियोजन हाती घेतले आहे.

२. कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक केला आहे. पण, कर्नाटकातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना मात्र कोणतेच बंधन नाही.

३. दिल्ली, कोलकत्ता, उत्तरप्रदेश या उत्तर भारतातून गलाई बांधव मोठ्या संख्येने गावाकडे परतत आहेत. पण त्यांचीही चाचणी केली जात नाही. बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही.