शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई - पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज अडीचशेपेक्षा अधिक कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज अडीचशेपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबई - पुण्यातून दररोज दीड ते दोन हजार नागरिक जिल्ह्यात येतात. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्हा व महापालिका प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तरीही रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. आठवड्यापूर्वी १०० ते १५० च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता दररोज अडीचशे पार गेली आहे. त्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे या शहरातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्याही सध्या वाढली आहे. या नागरिकांतून कोरोनाचा पसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या प्रवासी नागिरकांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. एकूणच रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्याची चिंता मात्र वाढू लागली आहे.

चौकट

एसटी बसस्थानक

सांगली येथील मु्ख्य एसटी बसस्थानकातून मुंबई, पुणे या शहरासाठी दिवसभरात २० हून अधिक बसेस धावतात. कोरोनामुळे जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. पण, मुंबई, पुण्याहून सांगली जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या दररोज एक हजारहून अधिक प्रवासी जिल्ह्यात येत आहेत.

चौकट

रेल्वे स्थानक

सांगली - मिरज रेल्वे स्थानकातून दररोज ११ रेल्वे गाड्या धावतात. त्यातील मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी, कोयना, हुबळी दादर एक्स्प्रेस आहेत. रेल्वेतून दररोज ५००हून अधिक प्रवासी जिल्ह्यात येत आहेत. तर मुंबई - पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र घटली आहे. उत्तरेकडील गाड्या मात्र वेटींगवर आहेत.

चौकट

ट्रॅव्हल्स

कोरोनामुळे खासगी बसने प्रवासी करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. पण, मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी बसने जिल्ह्यात परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. खासगी बसेसमधून दररोज २०० हून अधिकजण जिल्ह्यात येत आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे.

चौकट

बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही

१. मुंबई, पुण्यासोबत राज्यातील कोणत्याही शहरातून सांगलीत येणाऱ्या प्रवाशांची एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात येत नाही. त्याबाबत प्रशासनाकडून नियोजन हाती घेतले आहे.

२. कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक केला आहे. पण, कर्नाटकातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना मात्र कोणतेच बंधन नाही.

३. दिल्ली, कोलकत्ता, उत्तरप्रदेश या उत्तर भारतातून गलाई बांधव मोठ्या संख्येने गावाकडे परतत आहेत. पण त्यांचीही चाचणी केली जात नाही. बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही.