शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून बरसण्याआधी प्रशासन ‘दक्ष’

By admin | Updated: June 8, 2015 00:49 IST

आपत्ती निवारण कक्ष सुरू : पूरपरिस्थिती उद्भवल्यास ५५ बोटी सज्ज; खरिपासाठीची तयारी

नरेंद्र रानडे - सांगली -प्रतीक्षेत असलेल्या नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन थोड्याच कालावधित होणार आहे. हवामान खात्याने यंदा कमी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविला असला तरी, जिल्हा प्रशासनाने जोरदार पाऊस पडून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर्ण दक्षता घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात मान्सूनपूर्व बैठकीचे आयोजन केले होते. शहरात देखील प्रतिवर्षी पावसामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील शिराळा, पलूस, वाळवा आणि मिरज या चार तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. तेथील नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी पूर आल्यास तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्याकरिता ५५ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता पथके नेमली आहेत. महापालिकेने देखील आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन केले असून नावाड्यांना खास प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त धोका हा साथीचे आजार पसरण्याचा असतो. हे लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाने पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या संभाव्य ७२ गावांमध्ये ३८ वैद्यकीय पथके तयार ठेवली आहेत. जिल्ह्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक असणारी खते आणि बियाणे उपलब्ध करण्यावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. ४नदीपातळीवर लक्ष ठेवण्यासाठी कृष्णा खोरे उपखोरे कार्यालयात स्वतंत्र विभाग कार्यान्वित.४आंतरराज्य समन्वय प्रक्रियेअंतर्गत सांगली, कोल्हापूर, सातारा कार्यक्षेत्रातील १६ धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग तसेच आलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची माहिती घेण्याच्या कामास प्रारंभ. यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याअगोदरच प्रशासन सावध होण्यास सहकार्य. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे अथवा खतांची कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये. तसेच बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात अकरा दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे.- शिरीष जमदाडे, जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली.पावसाळ्यात कोणतेही साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी आरोग्य प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक असणाऱ्या एकवीस प्रतिबंधात्मक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वैद्यकीय बाबींसंबंधी कोणतीही अडचण आल्यास साथ व पूरनियंत्रण कक्ष जि. प.मध्ये सुरु केला आहे.- डॉ. राम हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारीआपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यशाळासांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मागील आठवड्यात उपायुक्त प्रशांत रसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून सर्वांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. आपत्ती निवारणार्थ शासनाकडून यापूर्वीच एक कोटीचा निधी प्राप्त झाला असून प्रत्येक जिल्ह्याला १० लाख रुपये, सांगलीला १५ लाख निधी मिळाला आहे. आता याच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मनपातर्फे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी नावाड्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.कृषी विभाग२२ मे २०१५ अखेर जिल्ह्यात उपलब्ध असलेला खत साठा (मेट्रिक टनमध्ये ) खत प्रकारमागणीउपलब्धतायुरिया४७५००१२३१८अमो. सल्फेट१२९००२५७०एम.ओ.पी.१७८००४६४५एन.पी.के.१७१००५६७७