शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय

By admin | Updated: March 16, 2015 00:06 IST

इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जन

दिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.
दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.
या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली. या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)


दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय
इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जन
दिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.
दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.
५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.
या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली.
या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)


समाजमंदिराच्या दुरवस्थेबाबत विविध खात्यांकडे व पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी दुरुस्तीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे.
- रमेश रणदिवे
तालुका संघटक सचिव